bjp govt ruin people of india says supriya sule politics Sakal
छत्रपती संभाजीनगर

Supriya Sule : भाजप सरकारने जनतेचे हाल केले- सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा

पैठण : सर्वसामान्य जनतेला त्रास देणाऱ्या भाजप सरकारने जनतेचे हाल केले आहे. यासाठी आता हे भाजपचे भ्रष्टाचारी सरकार बदलून आपले महाविकास आघाडीचे सरकार येत्या विधानसभा निवडणुकीत आणू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी (ता. १९) व्यक्त केला.

पैठण येथे राष्ट्रवादीतर्फे आयोजित विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव जनसंवाद यात्रेची सुरवात झाली. यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, लोकसभा निवडणूक जनतेने हाती घेतल्यामुळे विरोधकांना चांगली चपराक बसली आहे.

यातून राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले असले तरी ही हवा डोक्यात जाऊ न देता कार्यकर्त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत विजयी होण्यासाठी जनतेच्या संपर्कावर भर द्यावा लागणार आहे, असे आवाहन त्यांनी केली.

यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे, माजी आमदार संजय वाघचौरे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तायडे, शहराध्यक्ष उमेश पंडुरे, विलास शेळके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया जंगले, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, जिल्हा परिषद सदस्य अनिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

पैठण विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी माजी आमदार संजय वाघचौरे यांना द्यावी, अशी मागणी उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. याबाबत हास्य करत सुळे यांनी उमेदवारीचे हे काम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आहे, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT