Rojgar Hami Yojana esakal
मराठवाडा

'शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा, अन्यथा गाठ माझ्याशी..'; माजी बांधकाम सभापतीनं अधिकाऱ्यांना धरलं धारेवर..

नवनाथ इधाटे

फुलंब्री पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे.

फुलंब्री : फुलंब्री पंचायत समिती (Phulambri Panchayat Samiti) अंतर्गत असणाऱ्या रोजगार हमी योजना (Rojgar Hami Yojana) विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक पिळवणूक केल्याने संतप्त झालेल्या जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी चांगलीच शाळा घेतली. शेतकऱ्यांची अडवणूक करू नका, अन्यथा गाठ माझ्याशी असल्याचा इशारा गुरुवारी (ता. ११) दिला. फुलंब्री पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात अधिकारी कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली.

फुलंब्री तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या रोजगार हमी योजनेमार्फत मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी व जनावरांचे गाय-गोठे मोठ्या प्रमाणात मंजूर झालेले आहे. सदरील रोजगार हमी योजनेमार्फत हजेरी पत्रक भरून प्रत्येक आठवड्याला दिले जाते. त्यानंतर बांधकामाचे एकत्रित पैसे मिळण्यासाठी त्या कामाची एमबी करून ऑनलाइन करावे लागते.

मात्र, प्रत्येक कामामध्ये रोजगार हमी योजना विभागात असणाऱ्या कर्मचारी व अभियंते शेतकऱ्यांकडे सातत्याने पैशाची मागणी करतात. अनेक शेतकऱ्यांनी पैसे देऊनही त्यांचे कामे प्रलंबित असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील अनेक शेतकरी रोजगार हमी योजनेच्या विभागाचे गाऱ्हाणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती किशोर बालांडे यांच्याकडे मांडत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या बलांडे यांनी पंचायत समिती गाठून रोजगार हमी योजना विभागातील कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांची गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात चांगलीच कानउघडणी केली.

शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करू नका, शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा. आठ दिवसात प्रलंबित असलेल्या सर्व शेतकऱ्यांचे बांधकामाचे बिले तात्काळ ऑनलाईन करा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडणार आहे. तसेच शेतकऱ्यांची पिळवणूक न थांबल्यास गाठ माझ्याशी असल्याचा इशारा यावेळी माजी बांधकाम सभापती बलांडे यांनी रोजगार हमी योजनेच्या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

फुलंब्री पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक न करता सर्व बिले तात्काळ ऑनलाईन करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना सोबत घेऊन ठिय्या मांडणार आहे.

-किशोर बलांडे, माजी अर्थ व बांधकाम सभापती जि. प. संभाजीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT