Hingoli News 
मराठवाडा

Hingoli News : हंगामापूर्वीच उडीद, मूग हातचे जाणार? येत्या तीन-चार दिवसांतच करावी लागणार पेरणी

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली : जून महिना कोरडा गेला. जुलै सुरू झाला. पण, अजूनही अपेक्षित पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाने हुलकावणी दिल्याने अनेकांच्या शेतात पिकांऐवजी ढेकळेच दिसत आहेत. जूनमध्ये पाऊस पडलेला नाही. परिणामी, उडीद-मुगाच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. येत्या तीन-चार दिवसांत पेरणी न झाल्यास उडीद-मुगाचा पेरा करता येणार नाही.

जिल्ह्यात मोठ्या क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. त्यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन, कापूस आदी पिके घेतली जातात. रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. उन्हाची तीव्रताही वाढली आहे. पावसाने हजेरी न लावल्याने खते, बियाण्यांच्या बाजारातील उलाढाल मंदावली आहे. दुकानदारांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.

शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली नाही.

सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी या पिकांची पेरणी होते. गेल्या दोन वर्षांत तूर, सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मूग उडीद ही खरिपातील प्रमुख पिके आहेत. मात्र, पाऊसच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पाऊस सुरू‎ झाल्यास इतर पिकांच्या पेरणीलाही जोर‎ येईल. दरम्यान, ७ जूनला मृग नक्षत्र सुरू होते‎ व १५ दिवसांच्या या नक्षत्रात कमी-अधिक‎ पाऊस पडतो. यामुळे खरीप लागवडीची‎ लगबग सुरू होते. मात्र, यंदा मृग नक्षत्रच‎ कोरडे गेले. यामुळे शेतकरी हवालदिल झाले. यंदा कोरडा दुष्काळ पडतो की काय,‎ याची चिंता सतावू लागली आहे.

हवामान खात्याकडूनही नवनवीन अंदाज वर्तवले जात आहेत. यामुळे पाऊस लांबणार पण‎ कधीपर्यंत, याचे ठोस उत्तर मिळत‎ नसल्यामुळे शेतकरी चिंतीत आहेत. या पार्श्वभूमीवर कृषी विभागातील‎ जाणकारांकडून शेतकऱ्यांना १०० मिमी पाऊस ‎ झाल्यावरच पेरणी करा, असा सल्ला दिला‎ जात आहे.‎

खरिपातील मूग आणि उडीद या पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या ते जुलैच्या पहिल्या आठवड्यादरम्यानच करावी लागते. त्यानंतर पेरणी केली‌ तर उत्पादनात घट येते. त्यामुळे या पिकांची ८ ते १० जुलैपर्यंतच‌ पेरणी केली जाते. यंदा पाऊस लांबल्याने आता मूग, उडिदाऐवजी सोयाबीन पेरणी करावी.

- शिवराज घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT