Shiv Sena Split
Shiv Sena Split Sakal
मुंबई

Shiv Sena Split : शिवसेना पक्षाच्या फुटीची दोन वर्षे पूर्ण; जनतेचा कौल ठाकरेंना

दीपा कदम deepakadam3@gmail.com

मुंबई : ‘महाशक्ती आपल्या पाठीशी आहे,’ असा विश्वास शिवसेना फुटल्यानंतर पक्ष सोडून सोबत आलेल्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. खरेतर हे आव्हान उद्धव ठाकरेंना त्या महाशक्तीने दिले होते. ‘महाशक्ती’चे हे आव्हान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पेलल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

पक्षफुटीनंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला (उध्दव ठाकरे) १६.७२ टक्के मते आणि लोकसभेच्या नऊ जागा तर सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे) गटाला १२.९५ टक्के मते आणि सात जागा मिळाल्या आहेत.

त्याबरोबर या निकालानुसार शिवसेना ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि ऋतुजा लटके वगळता इतर तेरा आमदार आपापल्या विधानसभेत आघाडीवर आहेत. तर शिवसेनेच्या शिंदे गटातील ४२ आमदारांपैकी तब्बल २० आमदार पिछाडीवर आहेत.

२० जून २०२२ रोजी विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती, त्याचवेळी शिवसेनेच्या आमदारांनी मतदान करुन सुरतेची वाट धरली होती. शिवसेनेत धरणीकंप झाला. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. या फुटीनंतर सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्याचा निकाल दोन वर्षांनंतरही अद्याप बाकी आहे.

या दोन्ही गटांची लढाई तीन पातळीवर सुरु होती. पैकी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजून प्रलंबित आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर आणि निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आहे.

मागच्या दोन वर्षात ठाकरेंच्या बाजूने कोणतीच आश्वासक परिस्थिती नसताना निवडणूक निकालाने मात्र ठाकरे गटाला पुन्हा उभारी दिली आहे. ठाकरे गटाने लोकसभेच्या २१ जागा लढवल्या त्यापैकी नऊ जागा लढवताना १६.७२ टक्के मते मिळवली आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ असा शिक्का मारल्यानंतरही त्यांनी सात खासदार निवडून आणले आहेत. भाजपसोबत गेलेल्या शिंदेंनी १२.९५ टक्के मते देखील मिळवले आहेत. शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांगला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आमदारांसमोर धोक्याची घंटा वाजत आहे.

४२ पैकी २० आमदार त्यांच्या विधानसभेत पिछाडीवर आहेत. यामध्ये संजय गायकवाड (बुलढाणा), संजय राठोड (दिग्रस), संतोष बांगर (कळमनुरी), अब्दुल सत्तार (सिल्लोड), प्रदीप जैस्वाल (औरंगाबाद मध्य), संदीपान भुमरे (पैठण),

दिलीप लांडे (चांदिवली), रविंद्र वायकर (जोगेश्वरी), मंगेश कुडाळकर (कुर्ला), यामिनी जाधव (भायखळा), ज्ञानेश्वर चौगुले (उमरगा), तानाजी सावंत (परांडा), महेश शिंदे ( कोरेगाव), शंभुराजे देसाई (पाटण), योगेश कदम (दापोली), उदय सामंत (रत्नागिरी), प्रकाश आबिटकर (राधानगरी) आदींचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Hit And Run: हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ समोर; पाहा अपघाताआधी काय घडले

Hathras Stampede: 'त्यामुळे लोक बेशुद्ध होत गेले अन् गुदमरून मृत्यूमुखी पडले...', भोले बाबाच्या वकिलाचा नवा दावा

IND vs ZIM, T20I: एकदिवस आधी शुन्यावर आऊट झालेल्या अभिषेकचा दुसऱ्याच दिवशी शतकी धमाका, दिग्गजांच्या यादीत मिळवलं स्थान

Mumbai Police Constable: टीम इंडियाच्या विजयी परेडदरम्यान मुंबई पोलीस कॉन्स्टेबल ठरले "मॅन ऑफ द मॅच"; पाहा नेमकं काय घडलं?

Alyad Palyad Movie : पुन्हा येतोय 'अल्याड पल्याड' ; सिनेमाच्या निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा

SCROLL FOR NEXT