Aditya Thackeray esakal
मुंबई

Assembly Election: दोन वर्षांपासून गुजरात महाराष्ट्राला चालवत होता, आता जनताच न्याय करणार; मशाल धगधगणार! आदित्य ठाकरेंनी दंड थोपटले

Vrushal Karmarkar

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सर्व २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय पेच वाढला आहे. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात न्याय आणि सरकार बदलण्याची वाट पाहत आहे. हे आता राज्यातील जनता ठरवेल.

आदित्य ठाकरे म्हणाले, आपण सर्व महाराष्ट्रात ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो २० नोव्हेंबर आहे. या दिवशी मतदान होणार आहे. एकनाथ शिंदे-भाजप सरकार हटवून महाविकास आघाडीला बदल घडवायचा आहे. या सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राची लूट केली आहे. न्यायाची वाट पाहिली पण आता मतदारच न्याय करतील. जय महाराष्ट्र!” , असं ट्विट त्यांनी केले आहे.

ते म्हणाले की, आम्ही गेली २ वर्षे याची वाट पाहत होतो. निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा होती पण ते झाले नाही. आता आम्ही जनतेच्या दरबारात आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे. गेल्या २ वर्षांपासून आम्ही महाराष्ट्राची लूट पाहत आहोत, बेरोजगार तरुण सर्वत्र आहेत पण सर्व उद्योग आणि रोजगाराच्या संधी गुजरातला जात आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. गेल्या २ वर्षांपासून राज्य गुजरातने चालवले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमधून हे दिसून येईल की महाराष्ट्र महाराष्ट्र चालवेल आणि फक्त त्यांचाच आवाज ऐकेल.

तर दुसरीकडे यावर बोलताना अरविंद सावंत यांनी सांगितले की, आम्ही ज्या प्रकारे लोकसभा निवडणूक लढवली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवून जिंकू... भ्रष्टाचार, बेरोजगारी वाढली आहे. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था संपूर्ण कोलमडली आहे, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: निकाल त्यांच्या बाजूने लागत नाही तेव्हा... निवडणूक जाहीर होताच एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा, काय म्हणाले?

Mumbai News: मुंबई हादरली! भाजप माजी खासदाराच्या पुतण्याने संपवलं जीवन, इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून मारली उडी

Priyanka Gandhi: अखेर प्रियांका गांधी निवडणुकीच्या रिंगणात! पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर; वायनाडची जागा काँग्रेस राखणार का?

Baba Siddique Murder Case : वरातीत हवेत गोळीबार हाच मारेकऱ्याचा अनुभव... बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Chennai Flood : चेन्नईला पावसाने झोडपले! शाळा महाविद्यालयांना सुटी; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

SCROLL FOR NEXT