Rutuja Latke Andheri By polls Sakal
मुंबई

Andheri By-poll : माघार घेण्यासाठी मला धमक्या देतायत; अपक्ष उमेदवाराचा ठाकरे गटावर गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पोटनिवडणुकीचा विषय दिवसेंदिवस रंगत चालला आहे. रोज काही ना काही नवे मुद्दे समोर येत असून त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता आणखी ताणली जात आहे. आताही एक नवं प्रकरण समोर आलंय. या निवडणुकीत ठाकरे गटाकडून अपक्ष उमेदवारावर माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या प्रकरणी अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहीत आपल्याला धमक्या येत असल्याचं सांगितलं आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, "मी निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरलं होतं, मी अपक्ष उमेदवार आहे, छाननीअंती माझा अर्ज वैध असून माझ्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांच्या प्रतिनिधींनी मला भेटून माझ्यावर माघार घेण्यासाठी दबाव टाकला आहे. मी सध्या चिंताग्रस्त असून दडपणाखाली वावरत आहे. यांनी मला धमकी दिली आहे की माघार घेतली नाही तर तुला आणि तुझ्या परिवाराला आम्ही बघून घेऊ."

या पत्रात आपण चिंताग्रस्त असून तणावात आहे, असं मिलिंद कांबळे यांनी म्हटलं आहे. याशिवाय माझे आणि माझ्या परिवाराचे काही बरे वाईट झाल्यास या अर्जास उल्लेख असलेले सर्वजण त्याला जबाबदार असतील, असंही कांबळे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला त्यांनी हे पत्र दिलं आहे. आता आयोग या पत्राची दखल घेऊन काय कारवाई करतं हे पुढील काळात पाहायला मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

किंग कोहलीला भेटण्याची ओढ! Virat Kohli साठी १५ वर्षीय मुलाचा तब्बल ७ तास सायकल प्रवास

Solapur Crime: राष्ट्रीय खेळाडूने नदीपात्रात उडी घेत जीव दिला; नेमकं काय घडलं?

IPL Retention, मेगा ऑक्शन अन् अन् राईट टू मॅच कार्ड... बैठकीनंतर BCCI करणार मोठी घोषणा?

Nicholas Pooran ने मोडला पाकिस्तानच्या रिझवानचा मोठा विक्रम! २०२४ वर्षात ठरला नंबर वन

Latest Maharashtra News Live Updates : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 66 लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT