Shambhuraj Desai vs Sharad Pawar esakal
मुंबई

'शंभूराज देसाईंना शोधा आणि एक गावठी कोंबडा, वळगणीचे मासे बक्षीस जिंका'; शरद पवार गटाच्या 'या' बॅनरची जोरदार चर्चा

शर्मिला वाळुंज

मुरबाडमधील भर बाजारपेठेत पालकमंत्री देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा, असा फलक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लावण्यात आल्याने जिल्हाभर हा विषय चर्चेचा झाला आहे.

डोंबिवली : साहेब, आपला पत्ता कुठेच लागत नाही, तुम्ही जिथे असाल तिथून परत या. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. जिथे कुठे असाल तुम्ही परत या आम्ही तुमची वाट पाहतोय, आपल्या जिल्ह्यात अनेक समस्या आहेत, असे म्हणत ठाणे जिल्ह्याच्या नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना जिल्ह्याचा दौरा करण्याची साद घातली आहे.

एवढेच नाही तर पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शोधा आणि एक गावठी कोंबडा वळगणीचे मासे बक्षीस जिंका, असा आशय असलेला बॅनर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचौडे यांनी हा बॅनर लावला असून त्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर फारसे येताना दिसत नाहीत. डोंबिवलीत अमुदान कंपनीत स्फोट Dombivli (Amudan Company Explosion) होऊन काही कामगार मृत्यू पावले. एवढी भीषण परिस्थिती जिल्ह्यात असताना देखील शिवसेना नेते आणि पालकमंत्री शंभुराज देसाई डोंबिवली एमआयडीसीत नाहीच, पण ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले नाहीत. पालकमंत्री देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास विश्वासातले म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना साताऱ्याचे असूनही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आल्याची चर्चा सुरवातीपासून आहे.

Thane District Guardian Minister Shambhuraj Desai

मात्र, जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावण्या व्यतिरिक्त ते फारसे कुठे दिसत नाहीत. जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली, म्हणजे जिल्ह्यातील समस्या सुटल्या असे होत नाही. यासाठी जिल्ह्याचा दौरा करावा लागतो. पावसाळा सुरू झाला आहे. ठाणे जिल्ह्याच्या गावोगावी अनेक समस्या आहेत. त्या समजून घेण्यासाठी पालकमंत्री फिरत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. मुरबाडमधील भर बाजारपेठेत पालकमंत्री देसाई यांना शोधा आणि गावठी कोंबडा बक्षीस मिळवा, असा फलक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लावण्यात आल्याने जिल्हाभर हा विषय चर्चेचा झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर वाहनांची तुफान वाहन कोंडी होत आहे. या महामार्गावर वासिंद, खातिवली, आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू असलेली कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. आसनगाव-कसारा रेल्वे मार्गावरील नाशिक महामार्गावरील उड्डाण पूल मागील तीन वर्षांपासून रखडला आहे. या पुलावरील एका मार्गिकेतून वाहने धावतात. त्यामुळे माल वाहतूकदार, प्रवासी हैराण आहेत.

हे सर्व विषय का रखडले आहेत याची माहिती घेऊन त्यांना कामाला लावणे हे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांचे काम आहे. पण, पालकमंत्री देसाई ठाणे जिल्ह्यात फिरकत नसल्याने राजकीय पक्षासह नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री देसाई यांना ठाणे जिल्ह्याचा विभागवार दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याची, त्या मार्गी लावण्यासाठी सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT