Mumbai Politics sakal
मुंबई

Mumbai Politics : भाजप मुंबईमध्ये मोठ्या फेरबदलाच्या तयारीत; विद्यमान खासदारांचे पत्ते होणार कट?

Chinmay Jagtap

Mumbai Politics : 2024 सालची लोकसभा निवडणूक अगदीच जवळ येत आल्याचे पाहायला मिळत आहे. अश्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक सगळेच तयारीला लागले आहेत. यातच आता आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष मुंबईत उमेदवारांमध्ये बदल करू शकतो असे म्हटले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय जनता पक्ष येत्या काळात काहीतरी मोठे बदल करू शकतो. मुंबई मधून भारतीय जनता पक्ष आशिष शेलार किंवा विनोद तावडे यांच्यापैकी एकाला लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकतो असे म्हटले जात आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेतो याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

याचबरोबर माजी खासदार किरीट सोमैय्या यांना देखील पुन्हा एकदा खासदार बनण्याची संधी मिळू शकते. २०१९ साली मातोश्रीची नाराजी होती म्हणून सोमय्यांचे तिकीट भाजपने कापले होते. मात्र आता काळ बदलला आहे. पर्यायी येत्या काळात सोमैय्या पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील का? हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.

मुंबईमध्ये लोकसभेच्या सहा जागा आहेत. ज्यापैकी तीन जागा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आहेत. तर दोन जागांवर भारतीय जनता पक्षाने आपले उमेदवार बदलणार असल्याची चर्चा आहे. असे वृत्त साम टीव्ही ने प्रसारित केले आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT