मुंबई

Mumbai Crime: 'माझ्या विरोधातल्या केसमधली साक्ष बदल' म्हणत शिंदे गटाच्या कार्यकर्त्याने केला जीवघेणा हल्ला

Latest Thane News: राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे

सकाळ वृत्तसेवा

Latest Ambarnath News: "माझ्या विरोधातील केसमधली साक्ष बदल, अन्यथा जीवे मारू!" असं म्हणत अंबरनाथमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एका इसमावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.

यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी या गुन्ह्यात फेरफार करण्यात आल्याचा आरोप जखमी इसमाने केला असून राजकीय दबावापोटी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तर याबाबत पोलिसांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

अंबरनाथमध्ये राहणारे विनायक पिल्ले यांचे मित्र भरत पाटील यांच्यावर काही वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या प्रकरणात विनायक पिल्ले हे मुख्य साक्षीदार आहेत. या गुन्ह्यात शिंदे गटाचे माजी नगरसेवक लेनिन मुक्कु हे मुख्य आरोपी आहेत.

या प्रकरणाची 20 ऑगस्ट रोजी कोर्टात सुनावणी होती. या तारखेला विनायक यांनी जाऊ नये, यासाठी लेनिन मुक्कु आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कट रचून विनायक पिल्ले यांचं अपहरण करत त्यांना जीवघेणी मारहाण केली. विनायक पिल्ले हे रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी आपल्या बहिणीकडून राखी बांधून परत येत असताना वांद्रापाडा परिसरात गुड्डू रसाळ या तरुणाने त्यांचं जबरदस्तीने अपहरण केलं आणि त्यांना चिंचपाडा परिसरातील शिंदे गटाचे पदाधिकारी विकास सोमेश्वर यांच्या कार्यालयात नेलं. तिथे विकास सोमेश्वर आणि लेनिन मुक्कु यांच्यासह काही जणांनी 15 ते 20 मिनिटे मला मारहाण केली,

असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला. त्यानंतर विनायक यांना गाडीत घालून अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेट परिसरातील मैदानात नेण्यात आलं. तिथे त्यांचे हातपाय बांधून तब्बल एक ते दीड तास बेदम मारहाण करण्यात आली आणि मरणासन्न अवस्थेत विनायक पिल्ले यांना तिथेच टाकून देत शिंदे गटाचे हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पसार झाले, असा आरोप विनायक पिल्ले यांनी केला आहे.

यानंतर पिल्ले यांच्यावर सध्या भिवपुरी इथल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिथल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आता अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

मात्र या प्रकरणात आरोपींना राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्ह्यात फेरफार केली जात असल्याचा आरोप विनायक पिल्ले यांनी केला आहे. तर याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निफ्टी आणखी 1,000 अंकांनी घसरू शकतो; शेअर बाजारात सातत्याने का कोसळत आहे?

आज नाही जन्मदिन नाही पुण्यतिथी तरीही गुगलने का बनवला सुप्रसिद्ध गायक केके यांचं डुडल ?

Firing On School Van: उत्तर प्रदेशात देशाला हादरवणारी घटना! स्कूल व्हॅनवर तरुणांकडून गोळीबार

Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

IND vs NZ 2nd Test : ७ बाद १०३ धावा! Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला, पण विराटसह इतरांनी पार केला कचरा

SCROLL FOR NEXT