Navi Mumbai Municipal Corporation Dr. Kailas Shinde esakal
मुंबई

...अखेर नवी मुंबई महापालिकेने 'त्या' 14 गावांचं कामकाज घेतलं हाती; पालिका आयुक्त डॉ. शिंदेंचा आदेश जारी

शर्मिला वाळुंज

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सोमवारी पालिकेतील चार अभियंत्यांवर अतिरिक्त कामकाजाचा कार्यभाराची जबाबदारी दिली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

डोंबिवली : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावं पुन्हा नवी मुंबई महापालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) समाविष्ट करण्यात आल्याचा निर्णय मार्च महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केला गेला. गावांचा निकाल लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, पालिका या गावांचे कामकाज कधी हाती घेणार हा प्रश्न अनुत्तरीतच होता.

अखेर नवी मुंबई पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे (Dr. Kailas Shinde) यांनी आदेश जारी करत कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांच्याकडे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 14 महसूली गावांसंबंधी कामकाज पाहण्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. 11 जुलैपासून गावांच्या मालमत्ता हस्तांतरण कामाला सुरुवात होणार आहे. गावे पालिकेत समाविष्ट होऊन कामकाजास सुरुवात होणार असल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

नवी मुंबई महापालिकेतून वगळलेली 14 गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करावे यासाठी सर्वपक्षीय विकास समिती पाठपुरावा करत होती. सीएम एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असताना मार्च 2022 मध्ये गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये ही गावे पालिकेत समाविष्ट करण्याविषयी अधिसूचना जारी करण्यात आली होती. अधिसूचना जारी होऊन दीड वर्ष उलटले तरी याचा निकाल लावला जात नव्हता. दीड वर्षांपूर्वी याची अधिसूचना निघून देखील अंतिम निर्णय घेतला जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता होती.

अखेर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. कल्याण ग्रामीण विधानसभा आमदार राजू पाटील यांच्या पुढाकाराने सर्व पक्षीय विकास समिती सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या प्रश्नी भेट घेत होती. अखेर मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी कल्याण डोबिवली, उल्हासनगर, नवी मुंबईतील 14 गावे यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील यांसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी 14 गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्याचा निर्णय जाहीर केला.

या निर्णयावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी 14 गावांमध्ये जे भूमीपूत्र आहेत, गावकरी रहिवाशी आहेत यांची मागणी होती 14 गावांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये केला पाहिजे. आज तसा निर्णय मुख्यमंत्री यांनी त्याठिकाणी घेतला. त्याचा जीआर, नोटिफिकेशन देखील यावेळी काढण्यात आले आहे. आणि 14 गाव नवी मुबंई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेतले आहे. आता त्याठिकाणी डेव्हलपमेंट ही नवी मुंबईमध्ये जशा प्रकारे होते, तशीच 14 गावांमध्ये देखील होईल अशी प्रतिक्रीया दिली होती. तर स्थानिक आमदार राजू पाटील यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयानंतर 14 गावांच्या एकजुटीचा आज खऱ्या अर्थाने विजय झाला असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले होते.

हा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर लोकसभा निवडणूकांचा कालावधी होता. लोकसभा निवडणूका पार पडून निकाल लागला मात्र त्यानंतरही गावांचे कामकाज नवी मुंबई महापालिका प्रशासन हाती घेत नव्हते. यामुळे अजून किती दिवस हे घोंगडे भिजत ठेवले जाणार आहे अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. अखेर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सोमवारी पालिकेतील चार अभियंत्यांवर अतिरिक्त कामकाजाचा कार्यभाराची जबाबदारी दिली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

यामध्ये स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांच्याकडे परिमंडळ 2 जी विभाग कार्यालय ऐरोली या विभागाचे कामकाज यासोबतच महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 14 महसुली गावांसंबंधी कामकाज याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याविषयीची ऑर्डर निघाली असून यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येत्या 11 जुलैपासून 14 गावाच्या मालमत्ता हस्तांतरण कामाला सुरवात होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT