Mumbai News esakal
मुंबई

Mumbai News : विरार-कारगिल नगरमध्ये चाळीतील खोली नाल्यात कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

सकाळ डिजिटल टीम

विरार : विरार पूर्व कारगिल नगर येथील जयदीप शाळेमागील नाल्याशेजारी असलेल्या चाळीतील एक खोली मागील दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे रविवार, 14 जुलै रोजी सकाळी कोसळली. सदर खोलीत कुणीही राहत नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेनिमित्ताने विरार पूर्व कारगिल नगर-मनवेलपाडा परिसरातील अनधिकृत इमारती आणि चाळींचा प्रश्न पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे.या दुर्घटने नंतर महानगरपालिकेने बाजूच्या १२ रहिवाशांना रम खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

कारगिल नगर येथील जयदीप शाळेमागील नाल्याशेजारी अनेक अनधिकृत चाळी वसलेल्या आहेत. शनिवारी व रविवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्याशेजारी असलेली 15 वर्षे जुनी एका खोलीची भिंत ढासळून नाल्यात कोसळली. या खोलीत कोणीही राहत नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली आहे. सदर खोली ही एका नेपाळी व्यक्तीची होती. मात्र मागील काही वर्षांपासून ही व्यक्ती या इमारतीत राहत नसल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेविका मीनल पाटील यांनी दिली आहे. याच रहिवाशांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर महापालिका प्रभाग समिती ‘ब`चे प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय पाटील व वॉर्ड क्रमांक-25 च्या माजी नगरसेविका मीनल पाटील यांनी दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी केली.

दरम्यान; वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग ‘ब` समिती कार्यालयाने या चाळीतील 12 रहिवाशांना नोटिसा बजावल्या असून, आवश्यक काळजी म्हणून स्थलांतरित होण्याच्या सूचना केल्या आहेत. बांधकाम विभागाच्या एका पथकाच्या माध्यमातून या चाळींची पाहणी करण्यात येणार आहे. शिवाय या चाळींचे बांधकाम कोणी केले, याची माहिती महापालिकडून घेण्यात येत आहे, अशी अधिकची माहितीही प्रभारी सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी दिली.विशेष म्हणजे; या दुर्घटनेच्या निमित्ताने विरार पूर्व कारगिल नगर-मनवेलपाडा परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि नागरी सोयीसुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. या भागातील बहुतांश इमारती आणि चाळी 20 ते 25 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी नागरी सोयीसुविधांचा अभाव आहे. अनेक चाळी व इमारती दाटीवाटीने बांधलेल्या असल्याने या इमारती व चाळींत राहणाऱ्या रहिवाशांना कोंदट व अनारोग्याचा सामना करावा लागत आहे. अनेक बांधकामे ही नाल्यांवर आणि सरकारी जागांवर अतिक्रमण करून करण्यात आलेली आहेत. महत्त्वाचे म्हणजे इमारती व चाळींचे आयुर्मान संपलेले असल्याने त्या जर्राजर्जर झालेल्या आहेत. याकडे पालिका व स्थानिक राजकीय पक्षांचे लक्ष नसल्याने भविष्यात या इमारती आणि चाळींत राहणाऱ्या शेकडो रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार आहे.

सदर ठिकाणी खाली नव्हती, तर पत्र्याची शेड होती. ती आधीच तुटलेली होती. मात्र कालच्या पावसामुळे ती अधिक ढासळली. त्या ठिकाणी कोणीही राहत नव्हते. त्याचा मालक नेपाळी व्यक्ती असून, त्याच्याशी संपर्क झालेला नाही किंवा तोही इथल्या कुणाशी संपर्क ठेवून नाही. बांधकाम कुणी केलेले याची काहीही कल्पना नाही. पण दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका अधिकारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यांनी इतर 12 रहिवाशांना नोटीस बजावली असून, त्यांना स्थलांतरित होण्याचे आदेश दिलेले आहेत.

- मीनल पाटील, माजी नगरसेविका प्रभाग : 25

या दुर्घटनेनंर जीवित व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेन 12 इतर रहिवाशांना नोटीस बजावली आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाची टेक्निकल टीमही सदर जागेची पाहणी करणार असून, रहिवाशांना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना आज करणार आहे. स्थानिक रहिवाशांनी पालिकेला सहकार्य केले असून, संभाव्य धोका लक्षात घेऊन स्थलांतरित होण्यास संमती दिली आहे.

-संजय पाटील, प्रभारी सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती ‘ब`

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT