mumbai congress sakal
मुंबई

Loksabha Election: कॉंग्रेसला लढायच्या आहेत मुंबईतल्या चार जागा!

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

Loksabha Election: महामुंबईतील वर्चस्व परत मिळवण्याची हीच संधी असल्याने किमान चार लोकसभेच्या जागा लढायला मिळाव्यात, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगवेगळे झाल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा पाय रोवण्याची संधी आहे. पक्ष फुटल्याने शिवसेनेला जास्त जागा देणे ‘इंडिया’ला उपयोगाचे नाही.

काँग्रेसने ही भूमिका पहिल्याच बैठकीत मांडली आहे. ‘इंडिया’त चर्चा सुरू असली, तरी काँग्रेसने नमते घेणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले आहे.

दक्षिण मध्य, उत्तर पश्‍चिम, उत्तर मध्य आणि दक्षिण या चार जागा काँग्रेसला हव्या आहेत. विभाजित शिवसेनेसमोर नमते घेण्याची गरज नाही, असे काँग्रेसने नवे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना पहिल्याच महाराष्ट्र दौऱ्यात सांगितले आहे.

या जागा मिळणे शक्य नसल्याचे सांगू नका; अन्यथा मिलिंद देवरांसारखा ज्येष्ठ आणि काँग्रेस कुळातला नेता बाहेर पडण्याचा विचार करत असेल, तर ते पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी अत्यंत घातक ठरेल, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी, आमचा आग्रह कायम राहील, असे सांगितले आहे. महामुंबई हा मिनी भारत असल्याने येथील संदेश देशभर जाईल. त्यामुळे आपण हट्टाबाबत कायम असावे, असेही सांगितले गेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

Share Market Today: शेअर बाजार नव्या उच्चांकासाठी सज्ज; कोणते शेअर्स असतील तेजीत?

Tirupati Laddu Recipe: घरीच बनवा खास तिरूपती लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

Apple च्या आयफोन 16 सीरीजच्या विक्रीला सुरूवात, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी रांग

Work Stress : अति ताणतणावाचा कर्मचाऱ्यांना धसका, मानसिकतेवर परिणाम; आयटी क्षेत्रात सर्वाधिक प्रमाण

SCROLL FOR NEXT