Raj Thackeray 
मुंबई

Raj Thackeray In Thane: 'जोपर्यंत ठाण्यात बाहेरचे लोक आहेत, तोपर्यंत...'; राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला परप्रांतियांचा मुद्दा

कार्तिक पुजारी

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे महायुतीच्या नेत्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी आतापर्यंत महायुतीच्या नेत्यांसाठी दोन सभा घेतल्या आहेत. ठाण्यात त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सभा घेतली. याआधी त्यांनी आनंद आश्रम येथे जाऊन आनंद दिघे यांना श्रद्धांजली वाहिली. राज ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला.

राज ठाकरे म्हणाले की, ठाण्यात आल्यानंतर आनंद मठामध्ये गेलो. तिथे मला सगळे जुने दिवस आठवले. माझे आणि दिघेंचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मी त्यांना सांगायचो, स्वच्छता ठेवा. तिथेच ते झोपायचे. आज गेलो ते आता दिसलंच नाही. दिघे यांच्यासोबत ठाण्यात फिरायचो. तलावाचं शहर म्हणून ठाणे ओळखलं जायचं. आता तलाव बुझवण्यात आले अन् टँकर आले आहेत

ठाणे जिल्ह्यात जोपर्यंत बाहेरचे लोंढे येत आहेत, तोपर्यंत शहरात काहीच विकास होणार नाही. मला वाटतं संपूर्ण जगात ठाण्यात बाहेरुन येणाऱ्या लोकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. ठाणे एकमेव जिल्हा आहे जिथे सात ते आठ महापालिका आहेत. हे लोक इथले नाहीत तर बाहेरून आले आहेत. मला श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना सांगायचंय त्यांनी हे दिल्लीत गेल्यास आवरावं, असं ते म्हणाले.

ठाण्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या वाढणार असेल तर विकास होणार नाही. हा संकुचित विचार नाही. इथे राहायला हरकत नाही पण एक अट आहे. मराठी भाषा यायला पाहिजे. ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे जिथे कोणताच विषय नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे यांनी यावेळी ठाण्याबाबत चिंता व्यक्त केली. आपल्या आजूबाजूला कोण आहे, रिक्षा कोण चालवतंय, भाजी कोण विकतंय, कोण काय करतंय याची आपल्याला माहिती असायला हवी. मतदारसंघाच्या विकासाबरोबर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यादृष्टीने प्रतिनिधींनी काम करण्याची आवश्यकता आहे, असं राज ठाकरे म्हणाले. राज यांनी गेल्या काही

वर्षातील मुंब्रातून अटक झालेल्या दहशतवाद्यांची यादी वाचून दाखवली.

राज ठाकरेंची विरोधकांवर टीका

निवडणुकीदरम्यान युतीत लढलात ना? पुन्हा आपल्याशिवाय यांचं चालणार नाही असं लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची टूम बाहेर काढली. चार भिंतीत चर्चा झाली म्हणता. अमित शहांनी जेव्हा देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतलं तेव्हा गप्प का होता? आधीच जनतेसमोर का सांगितलं नाही? तुम्हाला जे मिळालं नाही त्यासाठी तुम्ही हे केलं, असं राज ठाकरे म्हणाले.

मला अनेक गोष्टी आवडत नाहीत. पण, पंतप्रधान मोदी यांचे काम मोठं आहे ते दुर्लक्ष करुन चालणार नाही. देशात चांगले मुस्लीम आहेत. पण, काही वाईट मुस्लिमही आहेत. त्यामुळेच फतवा काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून काही करता येत नाही म्हणून ते तडफडत आहेत, असं राज म्हणाले.

मुंब्रात संसदेवर हल्ला करणारा अतिरेकी सापडला. ईसीसचा दहशतवादी, लष्कर-ए-तयब्बाचे दहशतवादी यांना मुंब्र्यातून अटक झाली आहे. पॅलेस्टाईनसंबंधी दहशतवाद्यांचे कनेक्शन देखील मुंब्र्यात सापडले. त्यावेळी सामना मुखपत्रातून टीका करण्यात आली होती. पण, आता ते गप्प आहेत, असं म्हणत राज ठाकरे यांनी मुंब्र्यातील दहशतवाद्यांना अटक केल्याची यादी वाचून दाखवली.

गेल्या १० वर्षात एक गोष्ट त्यांना लक्षात आली आहे. आपल्याला हे लोक डोकं वर काढू देत नाहीत. म्हणून ते काँग्रेसला पाठिंबा देत आहे. देश विघातक शक्ती काम करत आहेत. विकासाबरोबरच सुरक्षा हा देखील मुद्दा लक्षात घ्यायला हवा. प्रतिनिधींचे ते काम आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT