mumbai 5 children drowned in sea near Marve beach searching for three child Sakal
मुंबई

Mumbai News : मार्वे बीच लगत समुद्रात 5 मुले बुडाली.. दोघांना वाचवण्यात यश तिघांचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मालाडमधील मार्वे समुद्र किनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेली पाच मुलं शनिवारी रात्री समुद्रात बुडाली. मुलांना बुडताना पाहून उपस्थित लोकांनी धाव घेत अंकुश शेवडे , कृष्णा हरिजन या दोघांना वाचवले.

मात्र शुभम जयस्वाल, निखिल कयुमकर आणि अजय हरिजन हे तीन जण बुडाले. बुडालेल्या मुलांचा शोध सुरु आहे. ही सर्व मुलं 12 ते 16 वयोगटातील आहेत. तिघांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. सध्या अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.

सध्या पावसाळ्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडू लागली. मुलांचा पत्ता लागत नसल्याने मार्वे बीचवर बेपत्ता मुलांसाठी हेलिकॉप्टरने शोधमोहीम सुरूच आहे.

युद्धपातळीवर शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मार्वे समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बीचवर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. फायर अँड रेस्क्यू टीम (FRT) शोध मोहिमेचे नेतृत्व करत आहे.

बोटी, लाइफ जॅकेट आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. शोध आणि बचाव कार्यात मदत म्हणून अनेक यंत्रणा सहभागी झाल्या आहेत. या यंत्रणामध्ये मुंबई महापालिकेचे अधिकारी, स्थानिक पोलीस, तटरक्षक दल, नौदल गोताखोर, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT