Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: तोतया पोलिसांची दिवसाढवळ्या लुटमार, दोन तरुणांविरोधात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

Bandra Crime: मुंबई - व्यवसायात जमा झालेली ३.२० लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी बँकेत आलेल्या तरुणाला तोतया पोलिसांनी भरदिवसा लुटले. हा प्रकार वांद्रे तलाव ते कार्टर रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोन तरुणांविरोधात गुन्हा नोंदवला.

शाहरुख शेरीफ असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. शाहरुख मूळचा केरळचा असून सहा महिन्यांपूर्वी पोटापाण्यासाठी मुंबईत आला. त्याच्या काकांचा माहीम येथे जुन्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यात शाहरुख अकाऊंटंट आहे. दिवसभर झालेल्या व्यवहारातील रक्कम बँकेत जमा करण्याची जबाबदारी शाहरुखवर होती. नेहमीप्रमाणे त्याने जमा झालेले ३.२० लाख रुपये सोबत घेतले आणि वांद्रे तलावाजवळील बँक शाखा गाठली.

शाहरुख यंत्राद्वारे रक्कम जमा करत असताना त्याच्या मागे एक तरुण उभा राहिला. गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे त्याने सांगितले. इतकी रक्कम तुझ्याकडे कुठून आली, असे विचारून या तरुणाने शाहरुखला.बळजबरी बाहेर आणत एका रिक्षात बसवले. त्यात आधीपासूनच अन्य तरुण हजर होता. रक्कम असलेली बॅग दोघांनी हिसकावून घेतली. रिक्षा कार्टर रोडवर येताच त्यांनी शाहरुखला खाली उतरवले, बॅगही दिली. त्याने बॅग उघडून पाहिली तेव्हा त्यात रोकड नव्हती.

शाहरुखने दिलेले वर्णन आणि सीसीटिव्हीच्या मदतीने वांद्रे पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT