Mumbai News  
मुंबई

Mumbai : मुंबईतील पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली! राष्ट्रीय उद्यानाला ४ दिवसांत ६ हजार नागरिकांची भेट

सकाळ डिजिटल टीम

- गायत्री श्रीगोंदेकर

मुंबई - मुंबईत जसा जसा पावसाचा जोर वाढतोय तशी तशी मुंबईच्या चौपाटी परिसरात आणि मुंबईपासून काही अंतरावर असणाऱ्या पर्यटनस्थळांवर गर्दी वाढते आहे. मात्र सध्या मुंबई आणि उपनगर जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना आणि पर्यटकांना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे.

याशिवाय मुंबईतील बोरीवलीमध्ये असणारे 'संजय गांधी नॅशनल पार्क' या राष्ट्रीय उद्यानात अनेक पर्यंटक वर्षभर भेट देण्यासाठी येत असतात. याठिकाणी तुम्ही कान्हेरी लेण्या, सिंह विहार, वनराणी, तुळशी तलाव अशा विविध ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.

नॅशनल पार्कमधील वन्यजीव आणि वृक्षवेलींना कोणतीही इजा न पोहोचता निसर्गाचा अद्भुत नजारा पाहण्यासाठी याभागात गर्दी वाढू लागली आहे.२७ जून ते ३० जून या ४ दिवसात अंदाजे ६ हजार पर्यटकांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिल्याची माहिती राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिली.

आठवडाभरात भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या (सरासरी अंदाजे)

२७/०६ - ८३७ पर्यटक

२८/०६ - ९०७ पर्यटक

२९/०६ - २९१७ पर्यटक

३०/०६ -१२८७ पर्यटक

पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजना

-तिकीट खिडक्यांमध्ये वाढ

-शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

- सायकलची सुविधा

-खबरदारी म्हणून प्रत्येक ठिकाणावर वनमजूर आणि वनकर्मचारी

-पेट्रोलिंग व्हॅन

-NIC ट्रेकिंग सेंटर

-ट्रेक करायला गेलेल्यांची ऑनलाईन नोंदणी

-ट्रेकला गेलेल्या गाईडसोबत वायरलेस संपर्क सुविधा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेची पूर्ण खबरदारी घेतली जाते. वनकर्मचारी आणि वनमजूर सातत्याने सर्व ठिकाणांवर तैनात असतात. पर्यटकांनी उद्यानातील गणवेशात असणाऱ्या वनकर्मचारी आणि वनमजुरांची मदत घ्यावी. जेणेकरून फसवणूक टाळता येईल. मुंबईकरांसाठी आणि बाहेरून आलेल्या पर्यटकांसाठीदेखील जवळचे हे निसर्गरम्य पर्यटन केंद्र आहे असल्याने अधिकाधिक पर्यटकांनी येथे भेट द्यावी.

- नरेंद्र मुठे, आरएफओ, तुळशी

नागरपूरहून मुंबईत कुटुंबियांसोबत फिरण्यासाठी आलेल्या विशाल लारोकर यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. मुंबईसारख्या धावणाऱ्या आणि गर्दीच्या शहरात इतके मोठे उद्यान ही शहराला मिळालेली देणं आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, राष्ट्रीय उद्यानांत मी कुटुंबियांसोबत भेट दिली. इथली व्यवतशा अतिशय उत्तम असून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या उद्यानात अत्यंत रम्य निसर्ग आहे. तुळशी तलाव विशेष आवडला, असेही त्यांनी सांगितले.

चौपाट्यांवर गर्दी वाढली

मुंबई हे खरंतर धावणार शहर आहे. अनेक नागरिक कामानिमित्ताने मुंबईत येतात. अशातच मुंबईतील चौपाटी हा कायमच बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांच्या आकर्षणाचा विषय राहिल्या आहेत. मंत्रालय परिसरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची पहिली पसंती ही मारिन ड्राइव्ह चौपाटी आहे. तर गणपती विसर्जन मिरवणुकांमुळे नागरिकांना गिरगाव चौपाटीचे ही आकर्षण असते.

मागील २ आठवड्यापासून सुरु झालेल्या कोसळधारांमुळे मुंबईकर आणि पर्यटकांचा ओढा आपसूकच या चौपाट्यांकडे वाढला आहे. जुहू, गिरगाव, मरिन ड्राइव्ह, बॅनस्टॅन्ड, दादर, अक्सा बीच, गोराई, मढ याठिकाणी पर्यटक आणि मुंबईकरांची गर्दी वाढते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saud Shakeel खेळला म्हणून पाकिस्तान पुढे जाऊ शकला; इंग्लंडविरुद्ध घेतली आघाडी

Beed Assembly Election 2024 : तर उमेदवार मीच असायला हवे , आमदार प्रकाश सोळंकेंनीच मागितली पक्षाकडे उमेदवारी

भीक मागून १ लाख इन्कम! भारतातल्या 'या' शहरात भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई, सरकारने लावला डोक्याला हात

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदे उतरवणार 'हा' तगडा उमेदवार; राहुल गांधींशी होते साथीदार

Stock Marketमध्ये पैसे बुडाले, वडिलांच्या भीतीने आईसह दोन मुलांचं धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT