Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution: २२ हजार किलोमीटर रस्ते धुतले, प्रदूषण पातळी घटली

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Pollution: मुंबईतील २२ हजार किलोमीटर रस्ते आतापार्यंत धुतले आहेत. त्यामुळे प्रदूषण पातळी घटली असून वातावरणाचा स्तर सुधारण्यास मदत झाली, असा दावा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला. महास्वच्छता अभियानाच्या उद्‍घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चहल म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे २२ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते धुण्यात आले आहेत. आजवर १३ विभागांत संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. त्यातून १८३ टन कचरा आणि १,१०० टन राडारोडा उचलण्यात आला आहे.

दररोज एक हजार किलोमीटर रस्ते धुण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून हवा गुणवत्ता निर्देशांक ३५० वरून निम्म्यावर आला आहे. काही ठिकाणी तर तो ९० च्याही खाली आला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभियानाला नवचेतना मिळाली असून त्याचे जनचळवळीत परावर्तन झाले आहे. मुंबई मॉडेल देशासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा आशावादही चहल यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT