बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (२३ सप्टेंबर) चकमकीत मृत्यू झाला. आता या चकमकीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. अक्षय शिंदेच्या मृत्यूमागे रश्मी शुल्का यांचा हात असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
नाना पटोले म्हणाले की, बदलापूर येथील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे. अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेत हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. स्वतःला आणि पोलिसांवर गोळी झाडली गेली आणि पोलिसांच्या गोळ्यांमुळे त्याचा मृत्यू झाला.
नाना पटोले पुढे म्हणाले, "या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बदलापूर घटनेतील शाळेच्या ट्रस्टीला अद्याप अटक झालेली नाही, तो फरार आहे, त्याला अद्याप अटक का झाली नाही? या प्रकरणातील फरार आरोपींना अटक होणार का? मुख्य आरोपींचा एन्काउंटर करून हा खटला संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे, या प्रकरणाची सत्यता समोर आणण्यासाठी पोलिसांनी आरोपींचे एन्काऊंटर केले आहे का? या घटनेमागे रश्मी शुल्कांचा हात आहे, असा थेट आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.