Mumbai : उन्हाळी सुट्टीनिमित्त मूळ गावी,पर्यटनाकरिता बाहेर पडणाऱ्या प्रवाशांकरिता रेल्वेकडून दरवर्षी उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येतात.
मध्य रेल्वेने यंदाच्या उन्हाळयात तब्बल ९२० उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविल्या असून .त्यातून तब्बल १० लाख ८९ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
उन्हाळी सुट्टीत दरवर्षी रेल्वेतर्फे उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येतात. यंदाच्या उन्हाळ्यात चालविलेल्या उन्हाळी विशेष गाड्यामध्ये पूर्ण वातानुकूलित स्पेशल, अनारक्षित स्पेशल आणि एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास डब्यांच्या संयोजनासह इतर गाड्यांचा समावेश होता. दानापूर, गोरखपूर, वाराणसी, बनारस, प्रयागराज, समस्तीपूर, करीम नगर करिता सर्वाधिक गाड्या चालविण्यात आल्या.
या गाड्या सीएसएमटी,दादर, एलटीटी, पनवेल, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथून चालविण्यात आल्या. यंदा नियोजित ९२० उन्हाळी विशेष गाड्यांपैकी ३५३ ट्रेन सेवा उत्तर प्रदेशसाठी, त्यानंतर २०५ सेवा बिहारसाठी, ८४ सेवा गोव्यासाठी, ३६ सेवा ईशान्येसाठी, ७४ सेवा महाराष्ट्रात आणि १६८ सेवा केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा व राजस्थान गंतव्यस्थानांसाठी आहेत. वरील राज्यांतून उन्हाळ्यातील प्रवासाची गर्दी लक्षात घेऊन , देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी या अतिरिक्त गाड्यांचे काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.