Railway sakal
मुंबई

Railway: प्रवाशांनों लक्ष द्या, कन्फर्म तिकीट नसल्यास थेट गाडीतून खाली उतरवणार; मध्य रेल्वेचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

Central Railway : तूमच्याकडे तिकीट नाही आणि काढलेले तिकीट कन्फर्मही झाले नाही.मात्र तरीही तूम्ही मेल- एक्सप्रेसमधील आरक्षित डब्यातून प्रवास करत असाल तर यापुढे सावधान..असे केल्यास तूमच्यावर दंडात्मक कारवाई तर होईलच शिवाय कुठल्याही रेल्वे स्टेशनवर उतरवून देण्याचे अधिकार आता तिकीट तपासणीसांना देण्यात आले आहे.मध्य रेल्वेच्या या निर्णयावर प्रवाशांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे.

लांब-पल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या कायम हाऊस फुल्ल धावतात. या गाड्यांचे आरक्षण मिळवण्यासाठी चार चार महिन्यापुर्वी प्रवाशांना तिकीटे बुक करतात. मात्र तरीही तिकीट कन्फर्म झाले नाही किंवा घाईघाईने विना टिकीट चढलेले प्रवासी सर्रास आरक्षित डब्यातून प्रवास करतात. तिकीट तपासणीस आल्यानंतर दंड भरुन इच्छित स्थळी जाण्याचे तिकीट तो बनवून देतात.

अनेकजण काऊंटर तिकीट काढून रेल्वेत प्रवास करतात.यामुळे स्लिपर कोच, वातानूकुलित डब्यामध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्याचा फटका आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसत होता. त्यामुळे अनेकदा कन्फर्म तिकीट असलेले आणि प्रतिक्षा यादीत असलेल्या प्रवाशांमध्ये वादा-वादी होत होती.

समाजमाध्यमांवर गर्दीचे फोटो कायम वायरल होत होते.या फोटोमुळे रेल्वेच्या कार्यपद्धतीवर टिकेची झोड उठवली जात होती. या सर्व कारणामुळे रेल्वेच्या आरक्षित डब्यात केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येईल. अन्य प्रवाशांना थेट रेल्वेबाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

अशी होणार कारवाई -

पुर्वी विनातिकीट किंवा जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांकडून तिकीट तपासणीस दंड भरुन, पुढचे तिकीट बनवून देत होते. ही पध्दतच आता मोडीत निघणार आहे. अशा प्रवाशांकडून आता सरसकट दंड न घेता त्याने आतापर्यंत प्रवास केलेल्या स्थानका दरम्यानचा दंड त्याच्याकडून आकारण्यात येणार आहे.

या प्रवाशांना दंड आकारुन कुठल्याही स्थानकावर उतरुन देण्याची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी प्रवाशाला कुठल्याही स्थानकावर उतरवून दिल्यास त्याच्या पुढच्या प्रवासाचे प्रश्न निर्माण होणार आहे.कुटुंबासोबत लहान मुले,महिला असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

प्रवाशांनी पुढची गैरसोय टाळण्यासाठी मेल-एक्सप्रेसचे वैध तिकिट घेउनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तुघलकी निर्णय

मराठवाडा, कोकणात प्रवास करणाऱ्यांसाठी तसेही रेल्वे गाड्यांचे कमी पर्याय आहे. काही महिन्यापुर्वी तिकीट काढूनही तिकीट कन्फर्म होत नसल्याच्या प्रवाशांचा तक्रारी आहे. अशा परिस्थिती मध्य रेल्वेचा हा निर्णय अत्यंत अन्याकारक असल्याचे रेल्वे प्रवाशांचे म्हणणे आहे.

शिवाय अनेकदा तातडीचे काम किंवा आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे अचानक रेल्वे प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकिट मिळू शकत नाही.त्यामुळे अशावेळी रेल्वेने मानतवादी दृष्टीकोन ठेवायला पाहीजे. शिवाय एखादे कुटुंब प्रवास करत असेल त्याला अचानक कुठल्याही स्टेशनवर उतरुन दिल्यास,त्याच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची असा सवालही विचारला जातो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT