मुंबई- शिंदे गटाने नेते गुलाबराव पाटील यांनी आझाद मैदानावर बोलताना ठाकरे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. गेले ३७ -३८ वर्षापासून दसरा मेळाव्यासाठी येत आहे. सुलभ शौचालयाल अंघोळ करायची. मराठी माणसाकडे वडापाव खायचा आणि सायंकाळी सहा वाजता मैदानावर यायचं. तरी अनेकजण आम्हाला बेईमान, गद्दार म्हणतात, असं म्हणत त्यांनी टीका केली.
आमच्यावर गद्दारीचा शिक्का मारला जातोय. माझी उद्धव ठाकरेंना विनंती आहे. अजित पवारांनी आमच्यात येऊल लव्ह मॅरेज केलं. त्यांच्याबाबत तुमचं काय मत आहे, असा सवाल त्यांनी तेला. बाळसाहेबांची आठवण केल्याशिवाय आमच्यासारख्या शिवसैनिकांचा दिवस जात नाही. मुख्यमंत्री काम करत नाहीत असं म्हणतात. पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला आहे, त्यातील मी एक शेतकरी आहे, असं ते म्हणाले.
संजय राऊत नावाचं मशिन म्हणतं सरकार काही करत नाही, शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जात आहेत, पण तरी हे लोक म्हणतात मुख्यमंत्री काही काम करत नाहीत. जो-जो आमच्या आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल. मराष्ट्रातील दौरे चेक केले तर सर्वात जास्त मुख्यमंत्र्यांनी केले आहेत, असं ते म्हणाले.
माझ्या जळगावमध्ये १३ महिन्यात ९ वेळा येणारे ते पहिले मुख्यमंत्री आहेत. घरात बसून काही होत नाही, मैदानात उतरावं लागतं. तितकी इच्छाशक्ती पाहिजे. इतिहास संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो. तळवे चाटणाऱ्या संजय राऊतांसारख्यांचा लिहिला जात नाही, असं म्हणत त्यांनी बोचरी टीका केली. आम्ही इतिहास लिहिणारे लोक आहोत. जो भगवा झेंडा बाळासाहेबांनी मुंबईमध्ये रोवला त्यांचे आम्ही शिवसैनिक आहोत, असंही ते म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.