मुंबई

Shrikant Shinde: येत्या विधानसभेत महायुतीचेच सरकार येणार; खासदार श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali: विरोधकांनी लोकांमध्ये फेक नरेटिव्ह पसरवला, तो नॅरेटिव्ह आम्ही पुसू शकलो नाही. लोकांनी त्याला बळी पडत एकगठ्ठा मतदान हे महाविकास आघाडीला केले. त्यामुळे त्यांचा विजय झाला मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे.

लोकांची दिशाभूल करून मतदान मिळवले परंतु ही गोष्ट वारंवार करता येत नाही असा आरोप विरोधकांवर करत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर आपला निशाणा साधला येत्या विधानसभेत महायुतीचे सरकार येणार असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या वतीने कल्याण येथे खासदार सुनील तटकरे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात केले होते.

कार्यक्रमाला सुनील तटकरे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. यावेळी राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलताना खासदार शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचे तसेच मतदानाचे गणित कार्यकर्त्यांसमोर मांडले. यावेळी विरोधकांना कुठे कुठे एक गठ्ठा मतदान झाले आपण कुठे कमी पडलो याचाही थोडक्यात आढावा सांगितला.

विरोधकांवर टीका करताना लोकांची दिशाभूल करत मतदान मिळवल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला तसेच ठाकरे पिता पुत्रांवर सडकून टीका केली.

विरोधकांनी संविधान खतरे मे, संविधान बचाव अशा सगळ्या खोट्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या. लोकांनी त्याला बळी पडून हे एकगट्टा मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवारांना केलं.

त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल. मात्र ही टेम्पररी गोष्ट आहे, ही पर्मनंट अरेंजमेंट नाही. लोकांची दिशाभूल करून लोकांच मतदान मिळवले. लोकांची दिशाभूल एकदा करू शकतात. वारंवार दिशाभूल होत नसते. येणाऱ्या विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील आणि पुन्हा महायुती सरकार महाराष्ट्रात येईल असा विश्वास व्यक्त केला .

मराठी माणूस खरी खऱ्या शिवसेनेच्या बाजूने उभा राहिला - श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंना टोला

वरळी मतदारसंघात 40 हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असं त्यांना वाटत होतं मात्र लोकांनी त्यांची जागा दाखवून दिली. वरळी मतदारसंघात फक्त 6 हजार मताधिक्य आलं. त्यांना वाटत होतं मराठी माणूस त्यांच्यासोबत आहे.

मात्र मराठी माणूस खऱ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या बाळासाहेबांच्या विचारांच्या बाजूने उभा राहिला आणि त्यांनी मतपेटीतून दाखवून दिलं. म्हणून 19% जे मतदान शिवसेनेला होत होतं त्यातील साडे 14 टक्के मतदान हे खऱ्या शिवसेनेला धनुष्य बाणाला पडलं. असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

त्यांच्याच लोकांनी पैसे वाटण्याचे काम केलं - श्रीकांत शिंदे यांचा सुषमा अंधारेवर पलटवार सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाकडून पदवीधर मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्याच लोकांचे कुठे कुठे पैसे वाटण्याचे काम चालू आहे असा पलटवार केला.

आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहावं लागेल - श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

वरळीत कमळ फुलणार नाही असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी पुढच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळीत उभे राहतात की नाही तोच एक मोठा प्रश्न आहे? की घाबरून दुसरा मतदारसंघ शोधतात हे पहावं लागणार असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Wari : उरुळी कांचनमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा नगारा रोखला; घटनास्थळी पुणे पोलिस अधीक्षक दाखल

Amol Kolhe: कधी कल्पनाही केली नव्हती, साहेबांमुळे शक्य झालं; पक्षाने मोठी जबाबदारी दिल्याने कोल्हे भावूक

Ashadhi Wari Toll Free : राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या महिला विरोधी विधानांचे पडसाद, पुण्यात 'जोडे मारो' आंदोलन

Kolhapur Rain : धरणांतील पाणी साठा वाढला, कोल्हापुरातील 14 बंधारे पाण्याखाली; शहर परिसरात पावसाचा जोर कायम

SCROLL FOR NEXT