मुंबई

मावळची निवडणूक अटीतटीची

CD

अनिल पाटील ः सकाळ वृत्तसेवा

खोपोली, ता. २४ ः महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी २२ एप्रिलला व महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करून २३ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करून पहिला टप्पा पार केला आहे. मावळमधील दोन्ही उमेदवार मातब्बर असून अन्य कोणताही उमेदवार त्‍या तोडीचा नसल्‍याने लढत बारणेविरोधात वाघेरे अशी दुरंगी होण्याची शक्‍यता आहे. मतदारांच्या दृष्टीने श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदे यांचे तर संजोग वाघेरे-पाटील हे उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे खास विश्वासातील असल्याचा मावळमधील लढत अटीतटीची होणार आहे.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे शिवसेनेकडून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले असून दहा वर्षांच्या कारकिर्दीत त्‍यांना उत्‍कृष्‍ट संसदपटू म्‍हणून गौरवण्यात आले आहे. दुसरीकडे संजोग वाघेरे यांनाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मोठा अनुभव असल्याने त्यांचीही राजकीय परिपक्वता मजबूत आहे. बारणे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व लोकसभा क्षेत्रातील पाच आमदारांचे मजबूत पाठबळ आहे. तर वाघेरे यांना महाविकास आघाडीकडून राज्यातील सर्वात ज्‍येष्ठ व अनुभवी नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आमदार सचिन अहिर, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शेकापचे नेते व आमदार जयंत पाटील यांचे मजबूत पाठबळ आहे.
सुरुवातीला खासदार श्रीरंग बारणे यांचे पारडे काहीसे जड वाटत होते, मात्र वाघेरे यांनीही संभाव्य उमेदवार म्हणून दोन महिन्यांपासून पूर्व तयारी करून संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत बारणेंना कडवे आव्हान निर्माण केले आहे. निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तसे वाघेरे यांच्याकडून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. बारणे यांच्यासोबत नेते, आमदार मोठ्या प्रमाणावर आहेत, मात्र समन्वयातील अभावामुळे २०१४ व २०१९ च्या निवडणुकांच्या तुलनेत यंदाची निवडणूक त्‍यांच्यासाठी काहीशी जड जात असल्‍याचे चित्र दिसत असल्‍याचे राजकीय जाणकार सांगतात.
एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील संपूर्ण मतदार संघ पिंजून काढून थेट मतदारांशी संपर्क प्रस्तापित करीत असून तर दुसरीकडे बारणेंची मदार कार्यकर्ता मेळावे, सभा व मोठ्या जनसभांवर आहे.

मावळ मतदारसंघाची निवडणूक १३ मे रोजी होणार असून प्रचाराला अद्याप १५ दिवस आहेत. दरम्‍यान महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून वातावरण निर्मितीसाठी शक्ती पणाला लावण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार आपापल्या अजेंड्यावर भक्कम प्रचार यंत्रणा राबवत आहेत, मात्र रोजगार, आरोग्य, शिक्षण व बंद पडलेल्या कंपन्यांचा प्रश्न, स्‍थानिकांचे-प्रकल्‍पग्रस्‍तांचे प्रश्नांकडे दोन्ही उमेदवारांचे दुर्लक्ष झाल्‍याचे दिसते. देशाचा विकास, राष्‍ट्रीय नेत्‍याच्या मनातील विचार मांडण्याऐवजी स्‍थानिक जनतेच्या मनातले बोला, अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदारांकडून करण्यात येत आहे.

निवडणुकीतील महत्त्‍वाचे मुद्दे
बंद कंपन्यांतील बेरोजगार व हक्काची देणी न मिळालेल्या लाखो कामगारांचा प्रश्न
नवीन उद्योग व रोजगार निर्मितीचा अभाव
अद्ययावत आरोग्य व शिक्षण व्यवस्‍था
खोपोली कर्जत वाढीव लोकल फेऱ्या
कर्जत-पनवेल लोकल सेवा
लोणावळा -पुणे वाढीव लोकल सेवा
खोपोली शहरासाठी अतिरिक्त पाणीसाठा निर्मितीसाठी प्रस्तावित धरण प्रकल्प
प्रस्तावित एमआयडीसी मार्गी लावण्यासाठी ठोस प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT