Mumbai murdered  sakal
मुंबई

Mumbai : ५००० न दिल्याने हत्या; १४ आरोपी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

वसई - चौदा वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. साकीनाका येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. संजय भारद्वाज असे आरोपीचे नाव आहे.

वसई येथे २०१० मध्ये ही हत्या झाली होती. वसई पूर्व येथील खैरपाडा येथील रहिवासी पांधारी शामु राजभर (वय २५) याने ५ हजार रुपये आगाऊ न दिल्याचा राग भारद्वाजला आला होता. त्यामुळे त्याने साथीदाराच्या मदतीने राजभरचा रुमालाच्या साह्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचे हात बांधून त्याला मातीच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिले होते.

आरोपी गेल्या चौदा वर्षांपासून बनारस, अंधेरी, मुंबई येथे लपून राहत होता. पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रींगी, सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संपतराव पाटील, पो. नि. अभिजीत मडके स.पो.नि. सचिन सानप, पो.उ.नि. तुकाराम भोपळे, पो.ह. शैलेश पाटील, धनंजय चौधरी, शामेश चंदनशिवे, अनिल चव्हाण व पो. शिपाई प्रवीण कांदे यांनी आरोपीला पकडण्याची कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT