मुंबई

रानसई धरणाच्या सुरक्षेला धोका

CD

उरण, ता. २६ (वार्ताहर) : तालुक्यातील औद्योगिक प्रकल्पांना, उरण शहर, तसेच २१ गावांतील जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या संरक्षक भिंतीचे निकृष्ट काम झाले आहे. यामुळे प्लास्टर ढासळू लागल्याने परिसरातील नागरिकांच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे. तरी एमआयडीसी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या धरणाची पाहणी करावी, नाही तर चिपळूण येथील तिवरे धरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
सध्या सततच्या पडणाऱ्या पावसामुळे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे धरणाच्या संरक्षक भिंतींला केलेले प्लास्टर ढासळू लागले आहे. संरक्षक भिंतीच्या लोखंडी जाळ्या, सळई या उखडून प्लास्टरसोबत पडू लागले आहे. याआधी २ जुलै २०१९ मध्ये रानसई धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षक भिंतींचे प्लास्टर अशाच प्रकारे ढासळल्याची घटना घडली होती. संबंधित ठेकेदारांनी संरक्षक भिंतींच्या प्लास्टरचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळेच ते ढासळू लागले आहे. त्यातून लोखंडी जाळ्या, सळ्या बाहेर आल्या आहेत, असे येथील कामगार वर्गाकडून सांगण्यात येत आहे. तरी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षक भिंतींच्या कामाची पाहणी करून दोषी कंत्राटदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. नाहीतर चिपळूण येथील तिवरे धरणाची (जुलै २०१९) पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती येथील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

धरणावर दृष्टीक्षेप
राज्य सरकारने एमआयडीसीच्या माध्यमातून उरण तालुक्यात रानसई धरणाची उभारणी केली. यासाठी रानसई, विंधणे, चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी १९७० मध्ये संपादित केल्या. रानसई या आदिवासीवाडी जवळील डोंगर परिसरात १९७० ते १९८१ या कालावधीत २४६.७६ मीटर लांब व १४ मीटर खोली; तसेच १५ दरवाजे असणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील धरणाची संरक्षक भिंत उभी केली आहे. ३५० एकर क्षेत्रात हे धरण आहे. यात १० एम.सी.एम. (१ हजार कोटी लीटर) इतके पाणी साठवले जाते. ओएनजीसी, एनएडी, भारत पेट्रोलियम, महावितरण कंपनी, उरण शहर; तसेच तालुक्यातील २१ गावांतील जनतेला या धरणातील पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तेथील प्लास्टर ढासळला आहे. तसेच तेथील जाळीही निघाली आहे. धरण परिसराची पाहणी केली आहे. पाऊस कमी झाल्यावर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
- विठ्ठल पाचपुंड, एमआयडीसी अधिकारी, उरण

उन्हाळ्यात लाखो रुपये देखाभालीवर खर्च केले जातात; परंतु अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे प्लास्टर वारंवार ढासळत आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे.
- अनंत नारंगीकर, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT