मुंबई

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यात खडी टाकून हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात असून ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना खड्ड्यांमुळे भेडसावणाऱ्या तक्रारींची दखल घेणे व त्याचे निवारण करण्यासाठी पालिकेने नुकताच टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. मागील वर्षीदेखील ऑक्टोबर महिन्यात पालिकेला जाग येऊन हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आला होता; पण तो विस्मृतीत गेला. आता पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे नाराजीचा सुरू उमटू लागल्यानंतर केडीएमसीकडून पुन्हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे.
कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून केडीएमसी प्रशासन आणि पालिका अधिकाऱ्यांवर चौफेर टीका होत आहे. खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, असा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे; मात्र प्रत्यक्षात ही कामे संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यांमुळे एका दुचाकीस्वाराचा मृत्यूदेखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासनाने १८००२३३००४५ हा टोल फ्री क्रमांक नागरिकांसाठी जाहीर केला आहे. नागरिकांनी आपल्या विभागातील खड्ड्यांविषयीच्या तक्रारी या टोल फ्री क्रमांकावर केल्यास तेथे त्या तक्रारीची नोंद करून घेतली जाईल. तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तक्रारीचे ठिकाण देऊन संबंधित खड्डे बुजविण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाणार असल्याचे शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी स्पष्ट केले आहे.
…..
खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक हैराण
डोंबिवली (बातमीदार) : शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर वाहने चालवणे धोकादायक झाले आहे. डोंबिवली ते मानपाडा, खंबाळपाडा, टाटा पॉवर, एमआयडीसीतील रस्ते, डोंबिवली पूर्व-पश्चिम, कल्याण पूर्व-पश्चिम, गोविंद बायपास शहरातील रस्ते पूर्णपणे खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, असे प्रवासी कल्याणी निकम यांनी सांगितले.
...
दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सर्वसामान्य नागरिक कर भरतात, याचा विचारही केला जात नाही. लोकांमध्ये जागरुकता आली, तरच सुधारणा होईल, नाहीतर या समस्या कायम राहतील.
- मनोहर मेहता, प्रवासी
….
खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास रिक्षाचालकांना होत आहे. या खड्ड्यांमुळे कमरेचा त्रास झाला असून कमरेला बेल्ट लावल्याशिवाय बाहेर पडता येत नाही.
- विनोद कांबळे, रिक्षाचालक

एमआयडीसीतील खड्ड्यांमध्ये माझी रिक्षा अडकल्याने ती काढण्याचा प्रयत्न केल्याने रिक्षा उलटी झाली आणि आणि मी पडलो. त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झाली असून गेला एक महिना मी घरीच आहे. रिक्षावर माझे घर चालते आणि महिनाभर मी घरीच अल्याने माझ्या परिवाराची गैरसोय झाली आहे, असे रिक्षाचालक हरेश्वर सिंग यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT