मुंबई

अत्याधुनिक ‘आय बाईक’वर गुन्हेगारांचा मागोवा

CD

विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. २१ : गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुरावा हा महत्त्वाचा भाग असल्याने नवी मुंबई पोलिसांनी आता गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीने घटनास्थळावरील पुरावे तत्काळ, तसेच योग्य पद्धतीने गोळा करण्यासाठी ‘आय बाईक’ कार्यान्वित केल्या आहेत. या दुचाकींमुळे गंभीर गुन्ह्यांची माहिती मिळताच अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचणे शक्य होणार असून वस्तुजन्य, तसेच भौतिक पुरावे शास्रोक्त पद्धतीने गोळा करण्यात येणार असल्याने गुन्हेगारांपर्यंत जलदगतीने पोहोचता येणार आहे.
एखाद्या गुन्ह्याच्या ठिकाणी पुरावे गोळा करताना पोलिसांकडून अनेक वेळा घाईगडबडीत काही त्रुटी राहून जातात. त्यामुळे सदोष पुराव्याअभावी आरोपी सुटण्याची शक्यता असते. अनेक वेळा पुराव्याअभावी आरोपीचा माग घेणे कठीण होऊन बसते. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासाच्या दृष्टीने पुरावे गोळा करून त्यांची हाताळणी योग्य पद्धतीने होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘आय बाईक’ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या बाईकमध्ये किट बॅग, डिजिटल कॅमेरा व घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची साधने, तसेच उपकरणे ठेवण्यात आली आहेत. शिवाय ‘आय बाईक’मुळे घडलेल्या गुन्ह्यानंतर योग्य पद्धतीने पुरावे गोळा करून त्याची योग्य पद्धतीने हाताळणी करण्यात येणार आहे.
-------------------------------------------------------
दोन पोलिस कर्मचारी तैनात
नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या इन्व्हेस्टीगेशन व्हॅनने हत्येसह बलात्कार, तसेच घरफोडीसारख्या अनेक गुन्ह्यांच्या ठिकाणी जाऊन गुन्हे उकल होण्याच्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम केले आहे. मात्र, काही गुन्ह्यांच्या ठिकाणावरील पुरावे हे तत्काळ शास्रोक्त पद्धतीने गोळा करणे आवश्यक असते, पण नवी मुंबई पोलिस दलाची हद्द मोठी असल्याने या व्हॅनला प्रत्येक ठिकाणी तत्काळ पोहोचण्यास अडचणी येत होत्या. याचाच विचार करून प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘आय बाईक’ कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी दोन शिफ्टमध्ये दोन पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत.
------------------------------------------------
पुरावे शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करणार
- कोणत्याही तपासात गुन्ह्याची जागा महत्त्वाची भूमिका बजावते. गुन्ह्याचा स्पॉट पंचनामा करणे, भौतिक, रासायनिक, जैविक आणि सशर्त पुरावे शास्त्रोक्त पद्धतीने तत्काळ गोळा करणे आणि जतन करणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणची छायाचित्रे घेणे आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे हा देखील तपास प्रक्रियेचा एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.
- काही गुन्ह्यांत व्यवस्थितरीत्या पुरावे गोळा न केल्यामुळे तपासात अडचणी येत असतात. त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे काही वेळा कठीण होऊन बसते. बऱ्याच घटनांमध्ये सबळ पुराव्यांअभावी आरोपींना फायदा होतो. त्यामुळे ते निर्दोष सुटतात. आता न्यायालयाकडून वैद्यकीय पुराव्यांना (सायन्टीफीक एव्हीडन्स) जास्त महत्त्व दिले जात असल्याने शास्त्रोक्त पद्धतीने पुरावे गोळा करणे पोलिस दलाला अत्यंत गरजेचे झाले आहे.
--------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT