मुंबई

हार्बरवासीयांना सापत्न वागणूक का ?

CD

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दर रविवारी असलेल्या मेगाब्लॉकमुळे बंद ठेवण्यात येणारे मार्ग, बिघाडामध्ये पर्यायी मार्ग नसल्याने हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागणारा मनस्ताप नेहमीचाच झाला आहे. गेल्या अनेक वर्षांत या मनस्तापातून एकाही लोकप्रतिनिधीने प्रवाशांची सुटका केलेली नाही. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून कायम असून हार्बर मार्गाला नेहमीच सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोपी प्रवाशांनी केला आहे. आगामी निवडणुकीतील उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत, या जाणून घेण्यासाठी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने सीएसएमटी ते पनवेल प्रवास केला.
नवी मुंबईचा विकास गेल्या काही वर्षांपासून झपाट्याने होत आहे. अनेक कॉर्पोरेट कार्यालय, उद्योग आणि व्यवसाय या भागात सुरू झाले आहेत. त्यामुळे लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील धावणाऱ्या लोकलवर प्रवाशांचा ताण येत आहे. मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान धावणाऱ्या हार्बर मार्गावरून सुमारे बारा ते पंधरा लाख प्रवासी रोज प्रवास करतात; परंतु अपुऱ्या लोकल फेऱ्या, दोन रेल्वे मार्गिका असल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात १६० लोकल गाड्या असून दररोज १३६ लोकल गाड्या धावतात. दररोज या गाड्यांच्या एक हजार ८१० फेऱ्या होतात. यामध्ये हार्बर मार्गावर ६१४ लोकल दररोज धावतात. मध्य रेल्वेच्या एखाद्या मार्गावर बिघाड झाल्यास लोकल दुसऱ्या मार्गावर वळवल्या जातात. मात्र, हार्बर मार्गावर हा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर बिघाड झाल्यास संपूर्ण सेवेचा बोजवारा उडतो आणि प्रवाशांना रस्ते मार्गाचाच पर्याय निवडावा लागतो. यावर उमेदवारांनी लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.
-------------
आम्हाला पण एसी लोकल द्या!
प्रवासी प्रतिसाद नसल्याचे कारण देत रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल बंद केली. सध्या उन्हाळा असल्याने एसी लोकलची मागणी होत आहे.
….
घाणीतून सुटका केव्हा?
हार्बर मार्गावरील रेल्वे रुळांशेजारी प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे तुकडे सर्रासपणे टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. हे चित्र नेहमीच असल्याचे मत प्रवाशांचे आहे, पावसाळ्यात याच कचऱ्यामुळे नाले तुंबतात. रेल्वे रुळावर पाणी साचून रेल्वे सेवा बाधित होते. त्यामुळे याकडे लक्ष देणाऱ्या लोकप्रतिनिधींची गरज आहे; परंतु रेल्वे रुळाशेजारी बेकायदेशीर राहणाऱ्या नागरिकांना काही लोकप्रतिनिधी पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

…..
गेल्या अनेक वर्षांपासून पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांना लोकल गर्दीचा सामना करावा लागत आहे.
- योगेश पारधी, प्रवासी
---
हार्बर मार्गावर दोनच मार्ग असून आणखी मार्गिका टाकण्यासाठी रेल्वेकडून आजपर्यंत ठोस कार्यवाही का झाली नाही. हार्बर मार्गावर जलद लोकल नाही तर किमान अर्धजलद लोकल सेवा तरी द्यायला हवी.
- रुचिता कांबळे, प्रवासी, नवी मुंबई
---
नवी मुंबईकरांनी मतदान करताना हार्बर मार्गावरील लोकलच्या समस्या विचारात घेऊन मतदान करायला हवे.
- तुषार पोटे, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Vasantrao Gadgil passed away: ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन!

RBI Action: आरबीआयने चार NBFC-मायक्रो फायनान्स कंपन्यांवर केली मोठी कारवाई; कर्ज देण्यावर घातली बंदी

Murder Case : पत्नी, प्रियकराचा खून करून पतीनं उचललं टोकाचं पाऊल..; घरी दोघांचं प्रेमसंबंध कळलं अन्...

PNG Success Story: कुटुंब रस्त्याच्या कडेला विकायचे दागिने आता 47 वर्षांचा सौरभ 192 वर्ष जुन्या कंपनीच्या IPO द्वारे झाला अब्जाधीश

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT