मुंबई

छाटणी केलेल्या फांद्यांच्या कचऱ्याचा ढीग

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : मागील काही दिवसांपूर्वी सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली होती. त्यानंतर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभाग खडबडून जागा झाला असून झाडांच्या फांद्या छाटणीचे काम हाती घेतले; मात्र छाटणी केलेल्या फांद्या रस्त्यावर तशाच पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच या फांद्यामधून दुर्गंधी पसरत आहे आणि डासांच्या उत्पत्तीला आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे डासांपासून होणाऱ्या आजारांचा धोका नाकारता येत नाही.

मागील आठवड्यात ठाणे शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावली होती. यावेळी शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात झाडे, झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. या घटनेनंतर पालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागाने झाडे हटवण्यास सुरुवात केली. त्यांनी ही पडलेली झाडे तोडली. त्याच्या छोट्या छोट्या फांद्यांचे ढीग करून ठेवले; मात्र अद्यापही यातील अनेक ढीग रस्त्याच्या बाजूला तसेच पडून आहेत. त्यामुळे वाहतुकीला अनेक ठिकाणी अडथळा होतो. तसेच मच्छरांचेही प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या तोडलेल्या झाडांच्या फांद्या त्वरित उचलाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या फांद्यांचा ढीग रस्त्याच्या बाजूला ठेवल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे या झाडांच्या छाटलेल्या फांद्या कधी हटवणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर प्रश्न
मागील आठवड्यात ठाण्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवघ्या काही मिनिटांच्या पावसाने शहरातील विविध भागात तब्बल ८८ वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली, तरी वाहने आणि घरांच्या पत्र्यांचे नुकसान झाले होते; परंतु एवढ्याशा पावसाने वृक्ष पडल्याने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातही धोकादायक स्थितीत शहरात किती वृक्ष आहेत, याची माहिती वृक्ष प्राधिकरण विभागाकडे नाही; तर दुसरीकडे यावर उपाययोजना करण्यात महापालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग कुचकामी ठरत आहे.

जर्मन तंत्रज्ञान सर्व्हेचे काय झाले?
२०२०-२१ या वर्षात एकूण ६२८ झाडे उन्मळून पडली होती. त्यानंतर दर वर्षी हा आकडा वाढतच आहे. मागील काही वर्षात शहरातील झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र वृक्ष का पडत आहेत, याचा अभ्यास करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला वेळ नाही. त्यातही देशी प्रजातीच्या वृक्षांऐवजी विदेशी प्रजातीच्या वृक्षांना महत्त्व दिले जात असल्यानेदेखील हे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यानुसार मागील वर्षी मोठ्या आकाराचे वृक्ष पडण्यामागे काय कारणे आहेत, शहरात अशा प्रकारचे वृक्ष किती आहे, याचा सर्व्हे जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून केला जाणार होता. त्यासाठी तज्ज्ञाची नेमणूकदेखील करण्यात आली होती; परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT