Navi Mumbai lehesun sakal
मुंबई

Navi Mumbai: लसणाचे दर २०० पार, आवक कमी असल्‍याने भाववाढ

CD

Navi Mumbai News: एपीएमसीतील घाऊक बाजारात लसूण १५० ते १६० रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून किरकोळ बाजारात लसणाचे दर २०० पार आहेत. सध्या आगोटीचे कामे करण्याची लगबग सुरू असून वर्षभराचा मसाला करण्यासाठी लसणाचा वापर करतात. मात्र दर वाढल्‍याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.


घाऊक बाजारात लसणाचे दर ५० ते ७० किंवा जास्तीत जास्त १०० रुपये किलोपर्यंत असतात, मात्र आठ महिन्यांपासून लसणाच्या दर चढे असून किरकोळ बाजारात लसणाचे दर २०० रुपये किलो आहेत. मध्यंतरी आवक कमी झाल्‍याने लसणाचे दर घाऊक बाजारात ३०० ते ३५० रु किलो झाले होते.

त्यामुळे किरकोळ बाजारात लसूण ४०० पार गेला होता. त्‍यानंतर आवक वाढल्‍याने दर कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे लसणाचे दर पूर्ववत होतील, अशी ग्राहकांना अपेक्षा होती. मात्र घाऊक बाजारात १५० वर स्थिरावलेले दर अद्याप कायम आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात लसणाचे दर महिनाभरापासून २०० रुपये किलोच्या वर आहेत. पावसाळ्यात त्‍यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

दोन महिने दर स्‍थिर


गतवर्षी लसणाचे उत्पादन ५० टक्केच झाले होते. सध्या घाऊक बाजारात लसूणच्या ५ ते ६ गाड्या येत आहेत. मागणी आणि पुरवठा यांचा ताळमेळ बसत नसल्याने दर वाढले आहेत. त्‍यामुळे ग्राहकांना लसणासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. आणखी दोन महिने हीच परिस्‍थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT