Brain Stroke Sakal
मुंबई

Brain Stroke : ‘ब्रेन स्ट्रोक’ भारतातील मृत्यूचे दुसरे कारण; मुंबईत हजारात एक बळी

सर्वात चिंताजनक परिस्थिती मुंबईची आहे, जिथे रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त असलेल्या हजारांपैकी एकाचा स्ट्रोकमुळे मृत्यू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News : जीवनशैलीतील बदल आणि खाण्या-पिण्याच्या सवयी आता कर्करोग आणि हृदयविकारासह अनेक घातक आजारांना निर्माण करत आहेत. आता या यादीत ‘ब्रेन स्ट्रोक’चाही समावेश झाला आहे. ‘ब्रेन स्ट्रोक’ हे भारतात मृत्यूचे दुसरे कारण बनले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे देशात दर सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे.

सर्वात चिंताजनक परिस्थिती मुंबईची आहे, जिथे रक्तदाब आणि मधुमेहाने ग्रस्त असलेल्या हजारांपैकी एकाचा स्ट्रोकमुळे मृत्यू होत आहे. मुंबईसह देशातील तमाम न्यूरोलॉजिस्ट या चिंतेत आहेत. याशिवाय, ब्रेन स्ट्रोकच्या घटना कमी करण्यासाठी त्यांनी विविध उपाययोजनाही सुरू केल्या आहेत.

ब्रेन स्ट्रोकची कारणे बैठी जीवनशैली, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजार आहेत. स्ट्रोकमध्ये मेंदूच्या वाहिन्यांमध्ये गुठळी निर्माण होते, ज्यामुळे मेंदूच्या इतर भागांमध्ये रक्तपुरवठा होत नाही.

यामुळे हात, पाय आणि चेहऱ्यावर अर्धांगवायू होतो. सुवर्णकाळात रुग्ण उपचारासाठी न पोहाेचल्‍यास त्याचा जीव वाचू शकतो. सध्या ब्रेन स्ट्रोकबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. एपिलेप्सी फाऊंडेशन आणि इंडियन स्ट्रोक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निर्मल सूर्या यांनी सांगितले की, स्ट्रोकचे केवळ २० ते ३० टक्के रुग्ण सोनेरी वेळेत रुग्णालयात पोहोचू शकतात.

सध्या देशातील ग्रामीण भागात न्यूरो सेंटरची कमतरता आहे, त्यामुळे अशा रुग्णांवर सामान्य रुग्णालयात उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या स्ट्रोकची लक्षणे दिसू लागताच रुग्णाला लहान रुग्णालयात नेण्याऐवजी सीटी स्कॅनची सुविधा असलेल्‍या रुग्‍णालयात न्यावे,

जेणेकरून स्ट्रोक झाल्याचे समजताच रुग्णाला थ्रोम्बोलिसिस प्रक्रियेच्या मदतीने चार तासांत त्याचे शारीरिक नुकसान उपचाराने वाचवले जाऊ शकते. यासोबतच रुग्णाने हायपरटेन्शनचे औषध नियमितपणे घेत राहावे, अन्यथा ब्रेन हॅमरेजचा धोका वाढतो.

देशात केवळ चार हजार न्यूरोलॉजिस्ट

डॉ. निर्मल सूर्या म्हणाले की, सध्या संपूर्ण भारतात केवळ चार हजार न्यूरोलॉजिस्ट आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या सव्वा कोटी लोकसंख्येपर्यंत सहजासहजी पोहोचणे शक्य नाही. ते म्हणाले की, चार हजारांपैकी सुमारे २,५०० न्यूरोलॉजिस्ट एकट्या देशातील मेट्रो शहरांमध्ये आहेत.

एकट्या मुंबईत १५० न्यूरोलॉजिस्ट आहेत, तर मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात १५० न्यूरोलॉजिस्ट आहेत. सध्या देशाच्या लोकसंख्येनुसार देशात १५ ते २० हजार न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांची गरज आहे.


यूपी, बिहार आणि राजस्थानमध्ये दयनीय परिस्थिती

डॉ. निर्मल सूर्या म्हणाले की, सर्वात दयनीय परिस्थिती उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, ओरिसा, गुवाहाटी, मेघालय, मिझोराम या राज्यांमध्ये आहे, जिथे न्यूरोलॉजिस्ट क्वचितच सापडतील. अशा परिस्थितीत ‘ब्रेन स्ट्रोक’नंतर रुग्णांना वाचवणे कठीण होऊन बसते. यासंदर्भात इंडियन स्ट्रोक असोसिएशन अनेक पुढाकार घेत आहे, ज्यामध्ये कुठेतरी यश मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT