मुंबई

ठाणे - नाशिक महामार्गावर मातीचे ढिगारे

CD

ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) ः ठाण्याचा वाहतूक विभाग वाहतूक कोंडी दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे; मात्र काही अज्ञातांनी ठाणे-माजिवडा उड्डाणपुलाजवळ नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात माती टाकली आहे. एका रांगेत १२ ते १५ डंपर येथे रिकामे केल्याने ढिगारे उभे राहिले आहेत. त्यामुळे महापालिकेने आरोपींचा शोध घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. हलक्या वाहनांसोबतच जड-अवजड वाहनांचा या वाहतुकीत मोठ्या प्रमाणात समावेश असतो. मुंबई, गुजरात, अहमदाबाद येथून मालवाहक वाहने, कंटेनर, ट्रेलर आदी अवजड वाहने नाशिकच्या दिशेने जातात. यासाठी मुंबई आणि घोडबंदरमार्गे येणारी वाहने माजिवडा उड्डाणपुलावरून पुढे नाशिककडे जातात. तर काही वाहने माजिवडा उड्डाणपुलाखालून जातात; मात्र माजिवडा उड्डाणपूल उतरतो तेथील मार्गावर १२-१५ डंपर मातीचे ढिगारे उभे करून अज्ञात डंपरचालक पसार झाला आहे.

वाहनांना अडथळा होईल अशा ठिकाणी एका रांगेत ही माती टाकली आहे. हा महामार्ग गुजरात, ठाणे, मुंबईला जोडला जात असल्याने या मार्गावर सतत वाहनांची गर्दी असते. अशावेळी येथे टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे कोंडी होत आहे. सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने अज्ञाताच्या या कृत्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याचा मोठा फटका वाहतूक पोलिस आणि वाहनचालकांना बसत आहे. दरम्यान, याबाबत ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही, त्यांनी व्हॉट्सॲपवरही प्रतिक्रिया देणे टाळले.

रस्त्याचे रुंदीकरण
ठाणे-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने ती दूर करण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. येथून जाणाऱ्या महामार्गाला समृद्धी महामार्ग जोडला गेल्याने सिमेंट काँक्रीटचा अतिरिक्त रस्ता बनविण्यात आला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने कोंडी दूर होऊ शकणार आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
राडारोडा टाकलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर वाहतूक पोलिसांची माजिवडा वाहतूक चौकी आहे. येथे २४ तास वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असतो. त्यामुळे हा अडथळा कोणी केला, याचा शोध या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो. शहरात काही ठिकाणी इमारत बांधण्यासाठी पाया खोदकाम सुरू आहे. तेथून ही माती उचलून येथे आणून टाकली आहे का, असा संशय व्यक्त केला जात आहे. ठेकेदाराकडून घोडबंदर, नाशिक, नवी मुंबई, मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर रात्रीच्या अंधारात राडारोडा टाकला जातो. पालिकेने अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.

मातीचे ढिगारे कोणी टाकले हे माहीत नाही. ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते, रस्ते विकास महामंडळ आदींकडे विचारणा केली आहे; पण हे काम त्यांच्याकडून करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
- डॉ. विनयकुमार राठोड, उपायुक्त वाहतूक विभाग, ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT