Uddhav Thackeray news in marathi esakal
मुंबई

Uddhav Thackeray: "मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य, इथं भांडण्यापेक्षा..." उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणावर केली भूमिका स्पष्ट!

Sandip Kapde

मराठा आंदोलकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “आधीचा भाजपा आणि आताचा भाजपा वेगळा आहे. मराठा आरक्षण संसदेतून दिलं पाहिजे, त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे.”

मराठा आरक्षणाचे न्यायालयीन मुद्दे-

उद्धव ठाकरे यांनी नमूद केले की, "बिहारने दिलेलं आरक्षण कोर्टाने रद्द केलं आहे आणि मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नाही." त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षण देण्यासाठी केवळ केंद्र सरकारलाच अधिकार आहे आणि हे आरक्षण दिल्लीतूनच मिळू शकते. त्यामुळे इथं भांडण्यापेक्षा दिल्ली प्रश्न सोडवू.

राजकीय भूमिका आणि मराठा समाजाचा न्याय-

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, "मी माझ्या खासदारांचा पाठिंबा द्यायला तयार आहे, सर्व पक्षांनी बसून तोडगा काढावा, माझा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. मोदींनी स्पष्ट करावं की इतर जातींना दुखावयाला ते तयार आहेत का? आरक्षणाबाबत मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे.”

धारावी पुनर्विकासावर ठाकरे यांची भूमिका-

उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकासावर देखील आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, “गेल्यावेळी मुंबईची अदाणी होऊ देणार नाही.  धारावीकरांना उचलून मुलुंड-दहिसर इथे टाकणं आम्ही होऊ देणार नाही. धारावीकरांना तिथेच घर देण्यात यावे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: मनपाचा ट्रक पडला २५ फूट खड्ड्यात..! पुण्यातल्या सिटी पोस्ट परिसरातील विचित्र घटना

IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

Latest Marathi News Updates : तारापूर एमआयडीसी कंपनीमध्ये भीषण स्फोट! पाच ते सहा जण जखमी

IND vs BAN Test, 2nd Day: गोलंदाजांमुळे पहिल्या कसोटीत भारताने वर्चस्व गाजवले, पण Rohit - Virat च्या अपयशाने टेंशन वाढवले

swami avimukteshwaranand: शंकराचार्य म्हणतात, ''जिन्ना बरोबरच होते!'' पाकिस्तानच्या संस्थापकांशी का झालं एकमत?

SCROLL FOR NEXT