मुंबई

कल्याण डोंबिवलीचा शुक्रवारी पाणी पुरवठा बंद

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २१ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी २४ तासांचा शटडाऊन शुक्रवारी (ता. २४) घेण्यात येणार आहे. गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या वतीने पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत जांभुळ जलशुद्धीकरण केंद्र व बारवी गुरुत्ववाहिनीवरील देखभाल व दुरुस्तीचे काम एमआयडीसीने हाती घेतले आहे. त्यामुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभुळ जलशुद्धी केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अतिरिक्त पाणीसाठा करून ठेवावा, असे पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी दाखल

IND vs BAN 1st Test : रोहितकडून Mohammad Siraj वर अन्याय, नेटिझन्स नाराज; पण, बांगलादेशला दिसले 'आकाश' Video

Narendra Modi: विदर्भ बदलतो संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण, ढासळलेला बालेकिल्ला नरेंद्र मोदी मजबूत करणार? वर्धा दौरा का आहे स्पेशल?

Crime: तक्रार केलीस तर... धमकी देत १३ वर्षीय मुलावर अत्याचार, ५० वर्षीय नराधमाचं कृत्य, मुलुंडमध्ये खळबळ

Shama Sikander : बालवीर फेम शमा सिकंदरने केला होता आयुष्य संपवण्याचा प्रयत्न ; खुलासा करत म्हणाली "हॉस्पिटलमध्ये मला दाखल..."

SCROLL FOR NEXT