Kapil Patil esakal
मुंबई

Kapil Patil : 10 वर्षे कृषी मंत्री असताना शरद पवारांनी ठाणे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी काय केले ?

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : मला एकाने विचारले तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केले. तेव्हा मी त्याला सांगितले की, ते दहा वर्षे कृषी मंत्री होते. त्यांनी काय केले. राज्यात त्यांचेच सरकार होते. त्यांनी ठाणे जिल्हयासाठी काय केले . त्यावेळी त्यांनी ठाण्यातील शेतकऱ्यांसाठी काही केले असते असा सवाल भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडून लढविणारे महायुतीचे उमेदवार खासदार कपील पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचा नामाेल्लेख न करता उपस्थित केला आहे.

ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स मैदानात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिर सभेचे आयोजन 15 मे रोजी करण्यात आले आहे. या सभेची माहिती देताना खासदार पाटील यांनी उपरोक्त सवाल उपस्थित केला आहे खासदार पाटील यांनी सांगितले की, आज आपल्याला नाशिक पुण्यावरुन भाजीपाला येतो.

दुध आपल्याला बाहेरुन येते. ते आपल्याला आणावे लागले नसते. ठाणे आणि मुंबईची लोकसंख्या ही राज्यातील एकूण लोकसंख्येच्या पैकी 25 टक्के आहे. या जिल्ह्यातील पैसे दुसऱ्या जिल्ह्यात जातात. त्याला लागणारे दूध हे नाशिख, धुळे, पुणे कोल्हापूर हून येते. इथे आपल्या गोव्या नाक्यावर मदर डेअरी आहे. मदर डेअरीत दूध बारामतीचे येतो. ही मदर डेअरी काढली. आत्महत्या शेतकऱ्यांकडून दूध घेऊन याठिकाणी विकायचे . हा निर्णय मी घेतलेला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT