Mumbai News esakal
मुंबई

Mumbai News : विशेष जन सुरक्षा विधेयकाविरोधात रस्त्यावर उतरणार; श्रमजीवी आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

विरार : महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा नागरिकांचा मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा डाव आखला आहे. महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम २०२४ या प्रस्तावित कायद्याचे विधेयक सरकारने या अधिवेशनात मंजूर करून कायदा करण्याचा घाट घातला आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेने तीव्र संताप व्यक्त करत हा संघटनांची गळचेपी आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना चिरडण्याचा प्रकार असल्याचे संघटनेने म्हंटले आहे. लोकांचे स्वातंत्र्य हिरावून नोकरशाहीच्या हातात देण्याचा विचारही घातक असल्याचे मत याबाबत श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी व्यक्त केले आहे. या विधेयकाच्या निषेधार्थ श्रमजीवी आक्रमक झाली असून या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.

पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे “अंतर्गत सुरक्षा कायदा विधेयक” आणून सरकारने नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचे काम केले होते, त्यावेळीही महाराष्ट्रात सर्वप्रथम श्रमजीवी संघटनेने याबाबत आवाज उठवून हे विधेयक सरकारला मागे घ्यायला भाग पाडले होते. आता पुन्हा या विशेष जन सुरक्षा विधेयकामुळे श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यात जवळपास ६ कोटी जनतेला सरकार मोफत धान्य देत आहे. म्हणजेच या स्वातंत्र्याच्या ७८ वर्षात आणि संविधानाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा राज्यातल्या सहा कोटी लोकांचा भुकेचा प्रश्न सरकार सोडवू शकलेला नाही. मग लोकांच्या भुकेच्या प्रश्नावर संघटित होऊन आंदोलन अरायचे नाही का? असा सवाल त्यांनी केला. संघटना करण्याचे स्वातंत्र्य सरकार हिरावून घेत असेल तर ते संघटना कदापि सहन करणार नाही असे सांगत संघटनेच्या प्रत्येक सभासदाला भाकरी इतकेच स्वातंत्र्य देखील महत्वाचे आहे. या स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावायला संघटनेचा एकही सभासद मागे हटणार नाही असे वारणा यांनी सांगितले.

या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होईल नाही होणार हा पुढचा प्रश्न आहे मात्र अशा पद्धतीने नोकरशाहीच्या हातात लोकांचे स्वातंत्र्य देणे हे घातक आहे असे विधान रामभाऊ वारणा यांनी केले आहे. नक्षलवाद , हिसाचाराचा बंदोबस्त करण्यासाठी कोणते कायदे कमी पडले सरकारने जाहीरपणे सांगावे. तसेच डिसेंबर २०२३ मध्ये नवीन भारतीय न्याय संहिता संसदेने मंजूर केली, त्यामध्ये या गुन्ह्यांचा समावेश करण्यासाठी सरकला कुणी अडवले होते असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर १ जुलै पासून देशभरात लागू झालेला नवा कायदा निष्प्रभावी आणि अपूर्ण आहे अशी कबुलीच आपण या विधेयकाद्वारे देत आहात असे सांगत विवेक पंडीत यांनी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. हे विधेयक जनतेचे स्वातंत्र्य हिरावून नोकरशाहीच्या हातात सोपविण्याचा केविलवाणा प्रकार असून याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असे सांगत श्रमजीवी संघटनेने अध्यक्ष रामभाऊ वारणा यांनी सांगत या विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचेही सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT