MIHIR SHAH 
मुंबई

Worli Hit And Run Case: मिहीर लूक बदलून पलायनाच्या होता प्रयत्नात! कारमध्येच...; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहीर शहा हा लूक बदलून पलायलन करण्याच्या प्रयत्नात होता, अशी माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली. मिहीरला काल विरार फाट्यावरुन पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला आज कोर्टात हजर करण्यात आलं. (Worli Hit And Run Case Mihir Shah trying to escape by changing his look Shocking disclosure of Police)

सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, मिहीरनं केलेला गुन्हा अतिशय गंभीर आहे. त्यासाठी लहान मोठ्या गोष्टी तपासायच्या आहेत. आरोपी हा पाळून गेल्यानंतर त्यानं आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला. कारमध्येच त्यानं स्वतःची दाढी केली, केस कापले.

या घटनेच्या तपासासाठी महत्वाचे असलेले CCTV देखील आरोपी डॅमेज करू शकतात, त्यामुळं त्याला पोलीस कोठडी दिली पाहिजे. यात एका महिलेचा अतिशय निर्घृणपणे मृत्यू झाला आहे, त्यामुळं अधिकच्या तपासासाठी मिहीर शहाला पोलीस कोठडी मिळाली पाहिजे, असंही सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितलं.

दरम्यान, मिहीर शहाच्या वकिलांनी म्हटलं की, जी कलमं त्याच्यावर लावण्यात आली आहेत त्यानुसार त्याला पोलीस कस्टडीची गरज नाही. एका दिवसाच्या कस्टडीमध्ये पोलिसांना सगळी माहिती मिळाली आहे. सगळे पुरावे पण मिळाले आहेत, आरोपी आता कोणताही पुरावा लपवू शकत नाही, त्यामुळं मिहीरला पोलीस कोठडीची गरज नाही असं मागणी त्यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT