Nanded Sakal
नांदेड

Nanded: नदीपात्र ओलांडून गाठावे लागते शेत; ‘कयाधू’वर पुलाची मागणी दुर्लक्षित

सकाळ वृत्तसेवा

कळमनुरी - कयाधू नदीवर पूल नसल्याने कोंढूर व डिग्रस (ता. कळमनुरी) येथील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतामध्ये जा-ये करण्यासाठी कसरत करवी लागते. डोक्यावर शेतीचे साहित्य घेऊन नदीच्या पाण्यातून वाट काढत शेत गाठावे लागते.

कोंढूर, डिग्रस येथील ग्रामस्थांची कयाधू नदीच्या पलीकडे शेती आहे. पावसाळा वगळता नदीत फारसे पाणी नसते किंवा पात्र कोरडे असते. त्यावेळी शेतकऱ्यांना जा-ये करण्यात अडचणी येत नाहीत. पावसाळ्यात मात्र नदीपात्र दुथडी असते.

वारंवार पूर येतो. याच काळात खरीप हंगाम जोरात असल्याने प्रत्येकाची पावले शेतीकडे वळतात. नदीला पूर आल्यास अनेकांची शेतीकामे ठप्प होतात.तरीही अनेक जण कामे वेळेत उरकण्याच्या प्रयत्नात जीव धोक्यात घालून नदीपात्र ओलांडतात.

अनेक शेतकरी शेती उपयोगी साहित्य डोक्यावर घेऊन नदीच्या पाण्यातून वाट काढत शेती गाठतात. नदीवर या भागात पूल बांधावा, अशी मागणी सातत्याने होते. त्याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT