कर्नाटक तसेच गोवा राज्यांतील नागरिक या मार्गावर अवलंबून असून, वैद्यकीय सेवांसाठी स्थानिक लोकांना गोव्याकडे जावे लागते.
खानापूर/ रामनगर : गोव्या (Goa) दरम्यानच्या राष्ट्रीय मार्ग रस्ता क्र. ४ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अनमोड रस्त्यावरील (Anmod Ghat) अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचे आदेश कारवारच्या जिल्हाधिकारी लक्ष्मीप्रिया यांनी गुरुवारी बजावला आहे. तीन महिने म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत हा रस्ता बंद करण्याचा आदेश दिल्यामुळे धारवाडहून (Dharwad) जाणाऱ्या वाहनांना आळणावर, हल्ल्याळ, यल्लापूर, अकोलामार्गे कारवारला आणि पुढे गोव्याला जावे लागणार आहे.
तर, बेळगावकडून येणाऱ्या वाहनांना चोर्ला घाटमार्गे (Chorla Ghat) गोव्याला जावे लागणार आहे. या आदेशानुसार सहाचाकी किंवा त्याहून अधिक चाकांच्या वाहनांना पाऊस संपेपर्यंत रामनगरहून जाता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवार (ता. ११) जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा मार्ग बंद राहणार आहे.
कर्नाटक तसेच गोवा राज्यांतील नागरिक या मार्गावर अवलंबून असून, वैद्यकीय सेवांसाठी स्थानिक लोकांना गोव्याकडे जावे लागते. उपजीविका करणाऱ्यांवर उपवासमारीची वेळ आली आहे; परंतु गोवा राज्यात जाणाऱ्या बसेस बंद झाल्याने रुग्णांनाही मनस्ताप झाला आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम करण्यात येणार नसतानाही कारवार जिल्हाधिकाऱ्यांचा रस्ता बंदचा निर्णय चुकीचा असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.