Congress state president Nana Patole esakal
पश्चिम महाराष्ट्र

'राज्यातील महायुतीचे सरकार गुजरातधार्जिणे, महाराष्ट्राला काँग्रेसशिवाय पर्याय नाही'; नाना पटोले स्पष्टच बोलले

सकाळ डिजिटल टीम

"लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसला चांगले यश मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल.''

अंकलखोप : "नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान झाल्यापासून खोटे बोलत आहेत. युवकांना नोकऱ्या देतो, महागाई कमी करतो, असे खोटे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली. मात्र गेल्या दहा वर्षांत महागाईचा उच्चांक झाला आहे. गरिबांना संपवण्याचे काम हे भाजप सरकार करत आहे. तर सध्याचे महाराष्ट्रातील सरकार गुजरात धार्जिणे आहे. काँग्रेसशिवाय (Congress) महाराष्ट्राला पर्याय नाही," असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले.

अंकलखोप येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रमप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहनराव कदम होते. यावेळी अंकलखोपच्या सरपंच राजेश्वरी सावंत यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत नाना पटोले यांनी केले.

नाना पटोले पुढे म्हणाले "एकीकडे "छत्रपती शिवाजी महाराज की जय "म्हणायचे व आमच्या दैवताचा अपमान करायचा हे फक्त भाजपच करू शकते. दुष्काळ व महापूर या काळात विश्वजित कदम जखमी असतानाही मोठ्या प्रमाणात मदतकार्य करत होते. मी त्याच्या पाठीशी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत चारशेहून अधिक जागा निवडून भाजप सत्तेत आले असते तर त्यांनी संविधान संपवले असते. राज्यातून महिला व मुली मोठ्या प्रमाणात गायब होतात. त्यांचा तपास लागत नाही, हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. पुणेसारख्या विद्यानगरी असलेल्या शहरात आज मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. तिजोरीत खडखडाट असून, सरकार ओव्हरड्राफ्ट घेत आहे. राज्यातील रस्ते मोठ्या प्रमाणात खड्ड्यात गेली आहे. महाराष्ट्र सरकार कंगाल झाले आहे."

आमदार विश्वजित कदम म्हणाले,"लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसला चांगले यश मिळाले. विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल. समज गैरसमजातून काही लोक बाजूला गेलेले असतात त्यांना सन्मानाने पक्षात परत सामील करून घेतले जात आहे . अंकलखोपच्या सरपंचांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे."

खासदार विशाल पाटील म्हणाले, "पलूस-कडेगाव तालुक्यातील यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य सर्वच काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले असतील. अंकलखोपच्या सरपंच काँग्रेसच्या विचारांच्या आहेत. त्यामुळे गावच्या विकासकामाला गती मिळेल" जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड म्हणाले "काँग्रेस विरोधी गटाच्या सरपंच असतानाही कोणताही मतभेद केला नाही. विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही. सरपंचांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे गावात विकासकामांचा डोंगर उभा राहील."

सरपंच श्रीमती सावंत म्हणाल्या,"दोन वर्षांत अंकलखोप ग्रामपंचायतीला भाजपकडून केवळ दहा टक्के निधी मिळाला असून उर्वरित ९० टक्के निधी आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या माध्यमातून मिळाला आहे. पहिल्यापासून काँग्रेसच्या सदस्यांनी सहकार्य केले आहेत. उर्वरित तीन वर्षांत गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही मंडळींनी विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला, मात्र मी त्यांना जुमानले नाही. ग्रामसचिवालयाचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देणार आहे. विना अट, विना शर्त मी प्रवेश केला आहे." यावेळी अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे सचिव कुनाल चौधरी, पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, जे. के. जाधव, अध्यक्ष वैभव पुदाले, प्रकाशराव पवार, धनंजय सूर्यवंशींसह कार्यकर्ते, मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Haryana Assembly Election Result: भाजपच्या विजयामागे EVM बॅटरीचा काय संबंध? ''99 टक्के चार्जिंग असेल तर भाजपचा विजय'' काँग्रेसचे आरोप

Pune News : जिल्ह्यातील सव्वातीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी रुपये अनुदान वर्ग

Pune News : शरद पवार यांची बोपदेव घाटात घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT