india emergency assembly election congress politics education Sakal
पश्चिम महाराष्ट्र

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड: भारतातील आणीबाणीचा काळ हा २५ जून १९७५ ते १९७७ असा २१ महिन्यांचा कालावधी होता. आणिबाणी मागे घेतल्यानंतर राज्यात १९७८ मध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. तेव्हा काँग्रेस विरुद्ध सारे पक्ष एकत्र येवून पुरोगामी लोकशाही आघाडीची स्थापना झाली होती.

अपेक्षेप्रमाणे "पुलोआ'ने सत्ता मिळविण्यात यश मिळविले. त्यावेळचे राजकीय कार्यकर्तेही तात्विक विचाराचे होते. सर्वांच्या सभेसाठी गावात एकच व्यासपीठ असायचे आणि त्या व्यासपीठावर काँग्रेस, शे. का. प आणि पुलोआच्या नेत्यांच्या सभा व्हायच्या. निवडणूक संपेपर्यंत व्यासपीठ तसेच असायचे.

निवडणूक झाल्यानंतर जनता पक्षाचे लोकनेते राजामराबापू पाटील हे सहकार मंत्री झाले तर विधान परिषदेवर निवडून येऊन प्रा. एन. डी. पाटील हे शिक्षणमंत्री झाले. त्यावेळीं वाळवा तालुक्यात तीन आमदार झाले होते, त्यापैकी दोन मंत्री आणि निवडून येवूनही विलासराव शिंदे हे आमदार राहिले होते. आज तिन्ही नेते आपल्यात नाहीत.

तथापि पूर्वीचे नेते आणि कार्यकर्ते तात्विक विचारसरणीचे होते. एकाच व्यासपीठावर सभा घेणारे आणि मतदारही तितकेच समंजस होते सर्वांच्या सभा ऐकण्याची मानसिकता ठेवणारे. नाहीतर आजकालच्या राजकारणातील नेते, कार्यकर्ते आणि मतदार हे संधीसाधू झालेत. व्यासपीठावरच कुस्त्या खेळणारे आणि गुलाल तिकडे चांगभले करणारे..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT