Former MP Raju Shetti  esakal
कोल्हापूर

'महायुती-मविआ'कडून छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांच्या पराभवानंतर राजू शेट्टींचा आरोप

पंडित कोंडेकर

बच्चू कडू यांची संभाव्य तिसरी आघाडी आमच्या डोक्यात नाही. पण, चळवळीचे पक्ष वाढण्यासाठी कदाचित आम्ही एकत्र येवू शकतो, असे शेट्टी म्हणाले.

इचलकरंजी : महायुती व महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचे काम सुरु आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केली. इचलकरंजीतील खासगी कार्यक्रमास आले असता, त्यांनी खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला.

शेतकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते विखुरले आहेत. त्यांना एकत्रित करण्याचे काम सुरु आहे. तर आगामी विधान सभा निवडणुकीत छोट्या पक्षांच्या आमदारांची संख्या वाढविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असेही शेट्टी यावेळी स्पष्ट केले.

विधान परिषद निवडणुकीत शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil) यांचा पराभव झाला. त्या संदर्भात बोलताना शेट्टी म्हणाले, रस्त्यावरची लढाई छोटे पक्ष लढत असतात. मोठ्या पक्षांना प्रश्न केवळ राजकारणासाठी असतात. सोडविण्यासाठी नसतात. त्यामध्ये ते लक्ष घालत नाहीत. त्यामुळे अशा पध्दतीने छोटे पक्ष संपले तर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. छोट्या पक्षांना किंवा संघटनाना संपवायचे, हे सगळ्याच मोठ्या पक्षांची प्रवृत्ती आहे. हा किंवा तो काम केले नाही तरी चालेल. त्याला निवडा किंवा आम्हाला निवडा, अशा पध्दतीचा जनतेसमोर पर्याय तयार करुन ठेवायचा, अशीच एकूणच मोठ्या पक्षाची प्रवृत्ती दिसत आहे.

''छोटे पक्ष त्यांच्या मुद्द्यासाठी म्हणून राजकारण करतात''

महाविकास आघाडी असो अथवा महायुती काय दोन्ही ठिकाणी छोट्या पक्षांची कुचंबना होत असते. चळवळीची निगडीत असणारे छोटे पक्ष त्यांच्या मुद्द्यासाठी म्हणून राजकारण करतात. ते तत्वाला चिकटून राहिल्यामुळे त्यांच्या काही मर्यादा ठरलेल्या आहेत. वैचारिक दिशा ठरलेली आहे. त्या गैरफायदा घेतला जात आहे, असे मला वाटते. महायुतीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाची काय अवस्था झाली होती. त्यातून छोट्या पक्षांना गिळंकृत करीत असल्याचे दिसून येईल.

''शेतकरी चळवळ मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न''

बच्चू कडू यांची संभाव्य तिसरी आघाडी आमच्या डोक्यात नाही. पण, चळवळीचे पक्ष वाढण्यासाठी कदाचित आम्ही एकत्र येवू शकतो, असे स्पष्ट करीत शेट्टी म्हणाले, चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे छोटे पक्ष आहेत, त्यांना करता येईल तेवढी मदत करणे आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची संख्या वाढविणे हे आमचे निश्चीतच उद्दिष्ट आहे, असे स्पष्ट करीत शेट्टी यांनी मी स्वतः व माझे सहकारी शेतकरी चळवळ मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. पुढील काही दिवसांत भारत राष्ट्र समितीमध्ये गेलेल शेतकरी चळवळीतील माजी आमदार शंकर धोंडगे, शरद जोशी संघटनेतील वामनराव चटप आम्ही एकत्रित बसून चळवळीतून विखुरलेल्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT