Maharashtra Industrial Development Corporation esakal
कोल्हापूर

राज्यात आता MIDC ची नवीन सात कार्यालये; कोणत्या जिल्ह्यांचा असणार समावेश? लवकरच एक-एक जिल्ह्याची होणार घोषणा

लुमाकांत नलवडे

सध्या कोल्हापुरात आणखी दोन औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भूसंपादनासह इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (Maharashtra Industrial Development Corporation) राज्यातील सात कार्यालयांचे विभाजन होणार आहे. त्यातून सातारा, सोलापूर, बारामती, अहमदनगर, जळगाव, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यांत स्वतंत्र प्रादेशिक अधिकारी कार्यालय होईल. सध्या सातारा जिल्ह्यातील कामकाज कोल्हापूर, तर सोलापूर जिल्ह्यातील कामकाज सांगलीतून होते. लवकरच यातील एक एक जिल्हा स्वतंत्र होणार आहे. यासाठी आवश्‍यक ९२ पदांची भरतीही होणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसी (MIDC) जिल्ह्यातील रिकाम्या जमिनीचा वापर उद्योगासाठी करून तेथे रोजगार उपलब्ध करून देणे, औद्योगिकरणाला पाठबळ देण्याचे काम करते. काही ठिकाणी विमानतळसुद्धा एमआयडीसीकडे आहे. मात्र, एकाच जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यातील कामकाज चालत आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष होत होते. त्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ होत होती.

कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी उद्योजकांना सुद्धा इतर जिल्ह्यातील एमआयडीसीच्या कार्यालयात जावे लागत होते. राज्यात एकूण १६ एमआयडीसीची कार्यालये आहेत. पुण्यातून बारामतीचा, कोल्‍हापुरातून साताऱ्याचा, सांगलीतून सोलापूरचा कार्यभार पाहिला जात होता. आता मात्र नवीन नियोजनानुसार किमान सात जिल्ह्यांना स्वतंत्र कार्यालय त्यांच्या जिल्ह्यात मिळणार आहे. परिणामी जिल्ह्यातील उद्योगांना अधिक चालना देण्यासाठी नव्याने औद्योगिक वसाहती स्‍थापन करण्यासाठी जोमाने प्रयत्न होऊ शकणार आहेत.

सध्या कोल्हापुरात आणखी दोन औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी गेली काही वर्षे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी भूसंपादनासह इतर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करणे आवश्‍यक आहे. अशीच काहीशी स्थिती प्रत्येक जिल्ह्यात आहे. आता नव्याने होणाऱ्या सात एमआयडीसीच्या कार्यालयामुळे प्रत्येक जिल्ह्याला विशेषतः नव्याने कार्यालय होणाऱ्या ठिकाणी उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी सुरू झाली आहे. प्रत्यक्षात मात्र टप्‍याटप्प्याने याची घोषणा होण्याची शक्यता आहे. महामंडळाचा वर्धापन दिन एक ऑगस्टला असतो. त्यादिवशी काही घोषणा होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

पदभरतीही होणार

सात जिल्ह्यांतील प्रादेशिक कार्यालये नव्याने तयार होणार आहेत. त्यासाठी साधारण ९२ पदांची आवश्‍यकता आहे. त्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये सात प्रादेशिक अधिकारी, पाच व्यवस्थापक, एक क्षेत्र व्यवस्थापक, सात उपरचनाकर, सात प्रमुख भूमापक, १४ सहायक क्षेत्र व्यवस्थापक, १७ सहायक, १७ लिपिक, सात वाहनचालक, दहा शिपाई पदांची भरती होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबचा रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT