कोल्हापूर

चारा व पाण्यासाठी धनगर बांधवांच्या दाही दिशा : पाण्याचे स्रोत कोरडे : वणव्यांमुळे जंगल परिसरातील चारा जळाला.

CD

05484, 05483
निळपण (ता. भुदरगड) ः येथे बकऱ्यांच्या कोकरांना उन्हाचा व पावसाचा त्रास होऊ नये यासाठी शेतात बांधलेली झोपडी. दुसऱ्या छायाचित्रात दारवाड (ता. भुदरगड) येथे भटकंती करताना मेंढपाळ. (अरविंद सुतार : सकाळ छायाचित्रसेवा).
..............
चारा-पाण्यासाठी मेंढपाळांची दाही दिशा

पाण्याचे स्रोत आटले : वणव्यांमुळे जंगल परिसरातील चारा जळाला

सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. २१ : सध्या वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे उन्हाच्या झळांचा फटका बकऱ्यांनाही बसू लागला आहे. बकऱ्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. यात वळवाचा पाऊस, उन्हाची काहिली यामुळे मेंढपाळांची ससेहोलपट होत असून, बकऱ्यांच्या चारा-पाण्यासाठी त्यांना दाहीदिशा भटकावे लागत आहे. उन्हामुळे बकऱ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांत धनगर समाजाचे वास्तव्य आहे. बहुसंख्य धनगर समाजबांधव मेंढपाळ व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. दरवर्षी पावसाळ्यात मेंढ्यांचे कळप कमी पावसाच्या भागात जातात. सोलापूर, सांगली, विजापूर व सीमाभागात ते बकऱ्यांचे कळप घेऊन जातात. पुन्हा पावसाळा संपल्यानंतर हे कळप कोल्हापूर जिल्ह्यात परततात. सध्या तरी गावोगावी पाणी व चाऱ्याच्या शोधार्थ बकऱ्यांचे कळप दाही दिशा भटकताना दिसत आहेत.
सध्या ऊसतोडणी हंगाम संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली आहेत. बहुतांशी शेतकरी उसाचा खोडवा, निडवा ठेवतात तसेच खरिपाच्या पेरणीसाठी जमिनीची मशागत करण्याची कामाची धांदल उडाली आहे. ज्वारीचा हंगाम संपला असून, सगळीकडे रिकामा ओसाड माळ आहे. अनेक ठिकाणी असणारे पाझर तलाव, विहिरी, कूपनलिका, नद्या कोरड्याठाक पडण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी बकऱ्यांना पाणी व चरण्यासाठी कुठेही जागाच उपलब्ध नाही.
.......
चौकट...
वणव्यांमुळे चाऱ्याचा प्रश्न
डोंगरांना वणवे लावल्यास पावसाळ्यात चांगला चारा येतो, या गैरसमजुतीतून अनेक ठिकाणी डोंगरांना वणवे लावले जातात. त्यामुळे निसर्गसंपदा नष्ट होऊन अनेक जीव मरून जातात. सध्या डोंगर भाग उन्हामध्ये मानवनिर्मित वणव्याने करपून गेला आहे. त्यामुळे बकऱ्यांच्या पाणी व चाऱ्यासाठी जायचे कुठे, असा प्रश्न मेंढपाळांसमोर ‘आ’वासून उभा आहे. उन्हातान्हात चारा व पाण्याच्या शोधार्थ ते भटकत आहेत.
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT