कोल्हापूर

हिरण्यकेशीची पातळी घटू लागली

CD

gad31.jpg
42827
जरळी : हिरण्यकेशी नदीवरील या बंधाऱ्यात पाऊस कमी झाल्यामुळे उपसा वाढला आहे. त्यामुळे पाणीसाठा कमी होत आहे. (छायाचित्र ः संजय धनगर).
-------------------------------------------------------
हिरण्यकेशीची पातळी घटू लागली
उपसा वाढल्याचा परिणाम : सहा बंधाऱ्यात ३७४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : यंदाच्या पावसाचे पाणी अडवण्यात उशीर करूनही हिरण्यकेशी नदीवरील तालुक्यातील सहा बंधाऱ्यांमध्ये ३७४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. परंतु, उपसा वाढल्याने साठवलेल्या पाणी पातळीत आतापासूनच घट होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे पाटबंधारे खात्याला पाणी नियोजनाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
यावर्षीचा पावसाळा सर्वांनाच घाम फोडणारा ठरला आहे. गणेश चतुर्थी दरम्यान पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट होवू लागल्याने पाटबंधारेने जरळी व निलजी बंधाऱ्यामध्ये दोन मीटरने बरगे घातले होते. मात्र इतर बंधारे मोकळेच सोडले. त्यानंतर पुन्हा दोन दिवसाच्या पावसाने पाणी पातळी वाढली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. यामुळे सातत्याने पाणी पातळीत घट होवू लागली. याचा अंदाज घेवून पाटबंधारेने वेळीच पाणी अडवले असते तर यापेक्षा अधिक साठा झाला असता. जेणेकरून चित्री मध्यम प्रकल्पातील पाण्याचे आवर्तन लांबले असते.
दोन वर्षापासून पाटबंधारेच्या निष्काळजीपणामुळे पावसाचे पाणी अडवण्याचे नियोजन फसत आहे. पावसाचे अधिकाधिक पाणी अडवले तरच उन्हाळ्यातील पाणी नियोजन करणे सोयीस्कर होते. मात्र पाटबंधारे यामध्ये अपयशी ठरत आहे. गतवर्षी परतीचा पाऊस असूनही केवळ ढिसाळ नियोजनामुळे जानेवारीतच चित्रीचे पाणी सोडावे लागले. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज होता. तरीसुद्धा पाटबंधारेने अवकाळी पावसाच्या आशेवर राहून बरगे घालण्यात हयगय केली. परिणामी अपेक्षेपेक्षा कमी साठा झाला. शिवाय झालेला साठाही आता उपसा वाढल्याने कमी होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी जानेवारीत चित्रीचे आवर्तन सोडावे लागणार आहे. परिणामी उन्हाळ्यातील पाणी नियोजनावर गंभीर परिणाम जाणवणार असून त्यासाठी प्रत्येक आवर्तनाला उपसाबंदीची कडक कार्यवाही होवू शकते.
---------------
आवक कमी, उपसा अधिक
यावर्षी अवकाळी पावसानेही पाठ फिरवली आहे. अजून उसाची तोडही जोमाने सुरू झालेली नाही. यामुळे उसासह खरीपातील भात पिकाला पाणी दिले जात आहे. ओढे कोरडे पडले आहेत. आंबोलीतून येणाऱ्या पाण्याची आवकही कमी झाली आहे. यामुळे यापेक्षा अधिक साठा वाढण्यात मर्यादा आल्या आहेत. यामुळे हिरण्यकेशीत अडवलेला पाणीसाठा हळूहळू कमी होवू लागला आहे. तो यापुढे वेगाने कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्यापी काही बंधाऱ्यात बरगे घालण्याचे काम सुरू असल्याने प्रवाह खंडीत झाल्याचे सांगून त्या बंधाऱ्यात होणाऱ्या अतिरिक्त पाण्याच्या प्रवाहाने पूर्वेकडील बंधाऱ्यात साठा वाढणार असल्याचे शाखा अभियंता श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
---------------
* बंधाऱ्यातील पाणीसाठा (द.ल.घ.फू मध्ये)
*खणदाळ ४८ *निलजी ६१ *जरळी ८८ *गिजवणे ७७ *हरळी ३३ *ऐनापूर ६७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT