कोल्हापूर

टीबी रुग्ण दत्तक

CD

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी
दत्तक घेतले २१६ टीबीचे रुग्ण
महिन्याला दिला जातो पोषक आहार : जिल्हा परिषद आरोग्य विभागासह इतर विभागांचाही पुढाकार

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : जिल्ह्यात क्षयरोगाच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पुढाकार घेतला जात आहे. २०२५ पर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे नियोजन आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या १३२४ क्षयरोगी आहेत. या क्षयरोगींपैकी २१६ रुग्णांच्या खर्चाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य आणि इतर विभागांतील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. सहा महिन्यांसाठी क्षयरोगींना दिल्या जाणाऱ्या विविध आहाराचा खर्च हे अधिकारीच करत असून, क्षयरोगींना दिलासा देत आहेत.
केंद्र सरकारने क्षयरोग अर्थात टीबीमुक्त भारत करण्याची मोहीम राबवली आहे. या क्षयरोग असणाऱ्या रुग्णांना महिन्याला विविध आहारांसाठी पाचशे रुपयांचा खर्च येतो. त्यांना पोषक आहार देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांसह इतर विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी सरसावले आहेत. एका रुग्णाला सहा महिन्यांचा सकस आहार दिला जातो. यासाठी लागणारा खर्च हा अधिकारी आणि कर्मचारी देत आहेत. क्षयरोग रुग्णांसाठी दिल्या जाणाऱ्या आहारामध्ये महिन्याला तीन किलो तृणधान्य, बाजरी, गहू किंवा ज्वारी दिली जाते. दीड किलो कडधान्ये, मटकी, डाळी, मुगाची किंवा तुरीची डाळ दिली जाते. अडीचशे ग्रॅम खाद्यतेल आणि एक किलो दूध पावडर किंवा शेंगदाणे दिले जातात. या सर्वांसाठी महिन्याला येणारा खर्च हे अधिकारी आणि कर्मचारी देत आहे.
जिल्ह्यातील एकूण १३२४ क्षयरोग रुग्णांपैकी सुमारे ३०३ रुग्णांनी स्वत:चा आहार स्वत: घेणार असल्याचे सांगितले आहे. १७० रुग्णांनी आहार घेण्याबाबत निर्णय दिलेला नाही. शिल्लक असणाऱ्या रुग्णांपैकी २१६ रुग्णांना अधिकारी आणि कर्मचारी मदत करत आहेत. दरम्यान, उर्वरित काही रुग्णांना मदत करण्यासाठी किंवा त्यांना दत्तक घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
...
जिल्ह्यातील नागरिकांनीही पुढाकार घ्यावा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिलेल्या सूचनेनुसार, जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, क्षयरोग असणाऱ्या रुग्णांसाठी योग्य व पोषक आहार द्यावा लागतो. काही रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT