कोल्हापूर

अलमट्टीतील पाणी साठ्याचे उल्लंघन ः समितीचा आरोप

CD

आलमट्टी, हिप्परगीतील पाणीसाठ्याच्या नियमाचे उल्लंघन
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती : विसर्ग वाढविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : आलमट्टी धरणात ५१५. १६ तर हिप्परगी बंधाऱ्यात ५२१.६० मीटर पाणीसाठा आहे. नियमांचे उल्लंघन करून त्यांनी पाणीसाठा केला आहे. त्यामुळे आलमट्टी आणि हिप्परगी दोन्ही धरणांतून विसर्ग वाढवावा. अन्यथा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसेल, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
केंद्रीय जल आयोगाच्या शिफारशीनुसार आलमट्टी धरणाची पाणी पातळी १५ जुलैपर्यंत ५१७.११ मीटर व ३० जुलैपर्यंत ५१३.६० मीटर असावे असा नियम आहे. तसेच ३० ऑगस्टपर्यंत ५१७ मीटर इतकी ठेवली पाहिजे. हिप्परगी बंधाऱ्याबाबत ही अशीच सूचना आहे. तसेच हिप्परगी येथील सर्व दरवाजे उघडे ठेवून ३० ऑगस्टपर्यंत उत्तरगीचे पाणी पातळी ५१७ मीटर ठेवण्यात यावी, असेही ठरले होते. मात्र, यंदा केंद्रीय जल आयोगाच्या तत्त्वांची अंमलबजावणी कर्नाटक जलसंपदा विभागाने सध्या केलेली दिसत नाही. हिप्परगे येथील धरणातील पाणीसाठा करून ठेवण्यावर त्यांचा भर दिसतो आहे. येत्या काही दिवसांत कोयना, वारणा, राधानगरीसह कृष्णा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रात पाऊस जोराचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आलमट्टी व हिप्परगी येथील सध्या असलेला धरणाचा पाणीसाठ्याचा विसर्ग वाढवण्याची गरज आहे. असे असताना आलमट्टी धरणाची आजची पाणी पातळी ५१५.१६ व हिप्परगीची ५२१ मीटर इतकी आहे. या दोन्ही धरणांतील पाणीसाठा सध्या विसर्ग वाढवून कमी केला नाही, तर येणाऱ्या काळात कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून महापुराचा धोका संभावत आहे. त्यामुळे कर्नाटक जलसंपदा विभागाशी तातडीने संपर्क साधून दोन्ही धरणांतील पाणीसाठा कमी करण्यासाठी विसर्ग वाढवण्याबाबत ठोस पाठपुरावा करावा, असेही समितीने या पत्रकात म्हटले आहे.

चौकट
मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारशी संपर्क साधावा
आलमट्टी धरणातील पाणी पातळी आजची ५१५.१६ मीटर आहे. तेथील पाण्याची आवक रोज सात टीएमसी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजूनही आवक वाढण्याची शक्यता असून, येथे ३१ जुलैच्या आत आलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१९ मीटर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक जलसंपदा विभागाने आलमट्टीतील विसर्ग वाढवणे अपेक्षित आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्नाटक सरकारशी संवाद साधून आलमट्टीचा डिस्चार्ज वाढवावा, अशी मागणीही समितीतर्फे केली जाणार आहे, अशी माहिती धरण अभ्यासक विजयकुमार दिवाण यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT