कोल्हापूर

‘भूमि अभिलेख’संबंधी आंदोलन तात्पुरते मागे

CD

‘भूमी अभिलेख’संबंधी
आंदोलन तात्पुरते मागे
आजरा ः भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराची चौकशी व्हावी, यासाठी आजरा तहसील कार्यालयासमोर ग्राहक पंचायत पदाधिकारी व किटवडे ग्रामस्थांनी आंदोलन केले. काही कर्मचारी चुकीच्या पद्धतीने मोजणी व आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा आरोप करून त्यांची खातेनिहाय चौकशीची मागणी केली. दरम्यान, तहसील कार्यालयात तहसीलदार समीर माने व आजऱ्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख विद्या तांगडे यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा झाली. चर्चेनंतर आंदोलन तात्पुरते मागे घेतले. यावेळी शांताराम पाटील, काशिनाथ मरे आदी उपस्थित होते. आंदोलनस्थळी माजी सभापती निवृत्ती कांबळे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.
----------
GAD94.JPG ः
95919
सुरेश चौगुले, सुभाष निकम

चौगुले विश्वस्त निधी
अध्यक्षपदी चौगुले
नूल ः नूल (ता. गडहिंग्लज) येथील पुष्पावती चौगुले शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विश्वस्त निधीच्या अध्यक्षपदी सुरेश चौगुले यांची, तर सचिवपदी सुभाष निकम यांची एकमताने निवड झाली. नागेश चौगुले अध्यक्षस्थानी होते. नीळकंठ कुराडे यांची विश्वस्त म्हणून निवड झाली. माजी अध्यक्ष अनंत बांदेकर यांच्या निधनामुळे हे पद रिक्त झाले होते. विनोद नाईकवाडी, मोहन यादव, प्रकाश कुलकर्णी, उदय पानारी, विजय चव्हाण, आबासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते. विलास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.
------------
ब्राह्मण सभेतर्फे
गुणवंतांचा गौरव
इचलकरंजी ः येथील ब्राह्मण सभेतर्फे लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळा १ ऑगस्टला आहे. यावेळी ब्राह्मण समाजातील गुणवंत विद्यार्थी, विद्यर्थिनींचा गुणगौरव होणार आहे. नुकत्याच झालेल्या दहावी व बारावी परीक्षेमध्ये ८० टक्के गुण प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थिनी, तसेच पाचवी व आठवी एनएमएमएस व एनटीएसएमटीएस, नेट-सेट, यूपीएससी, स्कॉलरशिप तसेच कला, क्रीडा, आरोग्य व आध्यात्मिक, योग क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर विशेष पुरस्कार मिळवलेल्या गुणिजनांचा गौरव करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गुणपत्रिका व योग्य प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतिसह २० जुलै अखेर ब्राह्मण सभा कार्यालय (झेंडा चौक) येथे नावे नोंदवावीत, असे आवाहन केले आहे.
-----------
वजनकाट्यातील
फसवणूक थांबवा
आजरा ः तालुक्यात विविध ठिकाणी व्यापाऱ्यांकडून वजन काट्यांमध्ये तफावत दिसून येत आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती व वजन काटे निरीक्षकांना दिले आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, तर मनसे शांत बसणार नाही, असा इशारा दिला. तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे. मनसे जिल्हा सरचिटणीस सुधीर सुपल, तालुकाध्यक्ष आनंदा घंटे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT