Sadabhau Khot and Devendra Fadnavis Sakal
पश्चिम महाराष्ट्र

शर्यतच नव्हे, खिलार वंश वाचला; सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा

सांगली - बैलगाडी शर्यती (Bullockcart race) सुरु व्हाव्यात, यासाठी सात वर्षांपासून कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई सुरु होती. ती अखेर जिंकली आहे. आता बळीराजाचा उत्सव पुन्हा सुरु होतोय आणि तो आनंददायी आहे. शर्यत नव्हे तर खिलार वंश वाचवणारा निर्णय आहे, अशा भावना आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला सशर्त मान्यता दिल्यानंतर खोत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. त्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले,‘‘बळीराजा, बैलगाडी मालक व चालकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सवाचा एक मोठा विजय आहे. गेले सात वर्षे बैलगाड्या शर्यतीसाठी रस्त्यावरची आणि कायदेशीर लढाई सुरु होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सभागृहात कायदा केला. पशुतज्ञांची एक समिती नेमून कर्नाटक, तामिळनाडूत सुरु असलेल्या बैल उत्सवाचा अभ्यास केला. बैल हा जंगली नव्हे तर पाळीव प्राणी आहे आणि तो शर्यतीला पळणारा प्राणी आहे, अशा पद्धतीची चांगली मांडणी केली. त्या समितीने ती न्यायालयापुढे आणली. सर्वोच न्यायालयात तो अहवाल सादर झाला.’’

ते म्हणाले, ‘‘अनेकांनी त्यात पाठपुरावा केला. सध्याच्या सरकारनेही त्यात पाठपुरावा केला. राज्यातील जे खिलार पशुधन आहे, त्याची उपयुक्तता दुधासाठी नसून त्याच्या पोटी जन्माला येणारा खिलार बैल शेतात मशागत आणि शर्यतीसाठी आहे. अलिकडे शेतीचे यांत्रिकीकरण झाले आहे. परिणामी खिलारची उपयुक्तता संपत चालली होती. शर्यती बंद झाल्या असत्या तर खिलार गाय आणि खोंड नामषेश किंबहुना नष्ट झाली असती. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे वरदान असणारी ही जात नष्ट होणे हातून घात करण्यासारखे ठरले असते. त्यामुळे हा निकाल सर्वार्थाने महत्वाचा आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT