Mohan Bhagwat esakal
पश्चिम महाराष्ट्र

Mohan Bhagwat : 'भोग-उपभोगामुळे पाश्चात राष्ट्रे विकृतीकडे चाललीयेत'; RSS सरसंघचालक मोहन भागवतांचं महत्त्वाचं विधान

सकाळ डिजिटल टीम

''धर्माधर्मातील अहंकारी मतभेदांमुळे अंतिम सत्याकडे पोचू शकत नाही. यासाठी अनेक आचार्य आणि विद्वान पंडितांनी आत्मविश्वासपूर्वक आपले ज्ञान जगाला दिले आहे.''

बेळगाव : भोग व उपभोग यामुळे पाश्चात राष्ट्रे विकृतीकडे चालली आहेत. परंतु, भारतामधे आस्था आणि चिंतन याची पक्की बैठक आहे. भारतीय संस्कृती (Indian Culture) आणि दर्शन याचे साऱ्या जगाला अप्रूप आहे. यामुळेच आपण आपली परंपरा आणि एकता टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले.

हिंदवाडी येथील गुरुदेव रानडे मंदिराच्या (Gurudev Ranade Temple) शताब्दी महोत्सवी सोहळ्याचे उद्‍घाटन गुरुवारी (ता. १) पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास श्रीरामचंद्र मिशनचे (हैदराबाद) पद्मभूषण कमलेश पटेल (दाजी) यांची प्रमुख उपस्थिती होती. गोगटे कॉलेजमधील के. के. वेणुगोपाल सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी ‘फुटप्रिंट्स ऑन द सायन्स ऑफ टाईम’ पुस्तक प्रकाशनाचा सोहळा झाला.

ते पुढे म्हणाले, ‘‘आपल्या आचरणातून सज्जनता दिसली पाहिजे. सामाजिक समरस्येतून एकता निर्माण शक्य आहे. भारतवर्षाला अशी जीवन पद्धती पूर्वापार लाभलेली आहे. आपण सारे एक आहोत. मी सर्वांचा आहे आणि सर्व माझ्यात आहेत, अशी आपली धारणा असली पाहिजे. ती अनेक वर्षांपूर्वी दृढ होती. पण याची विस्मृती अलीकडच्या काळात झाली आहे. हे सत्य जाणण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण त्यातील चढाओढीमुळे ते ध्येय गाठता येत नाही.

अर्थ, धर्म, काम, मोक्ष यालाही काही नियम आहेत. मोक्षाकडे जाण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अनुभूतीतून ज्ञानसंपदा दिली आहे. गुरुदेव यांचेही विचार हेच आहेत. अनुभूती नसेल तर प्रचिती येत नाही. मन, बुद्धी, शरीर मुख्य आहेत. पण यातून आत्मतृप्ती मिळत नाही. ती मिळवण्यासाठी आस्था व चिंतन याची परिपूर्ण बैठक परिश्रमपूर्वक साधता आली पाहिजे. पुरातन काळात जे काही सांगता आले, त्याचा सम्यक विचार भारतातच होत आहे. आपल्या सृष्टीला संपन्न बनवणे हे भारताचे लक्ष आहे. हे साऱ्या भारतात आधी होते, पण धर्माधर्मातील अहंकारी मतभेदांमुळे अंतिम सत्याकडे पोचू शकत नाही. यासाठी अनेक आचार्य आणि विद्वान पंडितांनी आत्मविश्वासपूर्वक आपले ज्ञान जगाला दिले आहे.’’

पद्मभूषण कमलेश पटेल (दाजी) यांनीही मार्गदर्शनपर विचार मांडले.याप्रसंगी अकॅडमी ऑफ कॉम्पेरेटिव्ह फिलॉसॉफी अँड रिलिजन (एसीपीआर) संघटनेचे ॲड. अशोक पोतदार व्यासपीठावर उपस्थित होते. गुरुदेव रानडे यांच्या ग्रंथसंपदेतून साकारलेल्या सात पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. स्वाती जोग यांनी सूत्रसंचालन केले. किशोर काकडे यांनी गीत सादर केले. डॉ अश्विनी जोग (सोलापूर) यांनी आभार मानले. संस्थेचे सचिव ॲड्. एम. बी. जिरली यांनी परिचय करून दिला. संस्थेचे सुब्रमण्यम भट, अमित कुलकर्णी, आर. के. जकाती यांच्यासह अन्य निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT